शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

“पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काँग्रेस-भाजपाला पराभूत करायचे आहे”; ममता बॅनर्जींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:41 IST

TMC Mamata Banerjee News: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ज्या भागातून गेली, तेथील एका भागात ममता बॅनर्जी यांनी बैठक घेत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या, असे सांगितले जात आहे.

TMC Mamata Banerjee News: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये सामील पक्षांमधील दरी वाढताना दिसत आहे. आताच्या घडीला पश्चिम बंगाल, बिहार येथून भारत जोडो न्याय यात्रा जात आहे. विशेष म्हणजे ज्या भागातून भारत जोडो न्याय यात्रा गेली, तेथील एका भागात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, सीपीआयएम आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी तयार राहावे, अशा सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित राहण्याचा संदेश दिला. यानंतर आता काँग्रेस आणि तृणमूलमधील चर्चेची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पदयात्रा काढली आहे. एका कार्यक्रमात बोलताना, तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यातील लोकांच्या हक्कांसाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-सीपीआय(एम)-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र राहायला हवे, असे सांगत तृणमूलच्या विजयाचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा पलटवार

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला. जर पश्चिम बंगालमध्ये चोरी होत असेल, तर ती होत नाही असे कसे म्हणता येईल? भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना आपण भ्रष्ट म्हणू शकत नाही का? असा खोचक सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. 

दरम्यान, स्वबळावर लोकसभा निवडणुका लढवण्याच्या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, इंडिया आघाडीने माझा एकही प्रस्ताव स्वीकारलेला नाही. अशा स्थितीत आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही पक्षात समन्वय नाही. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस