शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

'अधीर रंजन चौधरी...', TMC ने सांगितले बंगालमध्ये जागावाटपाचा निर्णय न होण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 7:16 PM

TMC On Congress: टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर गंभीर आरोप.

I.N.D.I.A Seat Sharing: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (24 जानेवारी) राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेस आणि विरोधी आघाडी 'India'ला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गुरुवारी (25 जानेवारी) तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये स्वबळाच्या निर्णयाचे कारण सांगितले. 

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसीमध्ये युती न होण्याचे खापर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यावर फोडले. ओब्रायन म्हणाले, 'बंगालमध्ये युतीचे काम न होण्यामागे तीन कारणे आहेत. अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी. इंडिया आघाडीचे अनेक टीकाकार होते, परंतु भाजप आणि अधीर रंजन चौधरी यांनी आघाडीविरोधात वारंवार विधाने केली.'

डेरेक ओब्रायन पुढे म्हणाले, 'गेल्या दोन वर्षांपासून अधीर रंजन चौधरी भाजपची भाषा बोलत आहेत. बंगाल केंद्रीय निधीपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी एकदाही उपस्थित केला नाही. ईडीने बंगालमध्ये टीएमसीवर कारवाई केली, तेव्हा त्यांनीही त्याला पाठिंबा दिला होता', असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, टीएमसी आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यात विविध मुद्द्यांवरुन अनेकदा वाद झाले आहेत. अलीकडेच टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, जर आम्हाला आघाडीत योग्य महत्त्व दिले नाही, तर आम्ही बंगालच्या सर्व 42 जागांवर निवडणूक लढवू. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, आघाडीत लहानसहान गोष्टीत होत राहतात, मात्र आम्ही यावर तोदगा काढू. ममतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश बुधवारी म्हणाले होते, ममता बॅनर्जींशिवाय 'इंडिया' आघाडीची कुणी कल्पना करू शकत नाही. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक