शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

खत प्रकल्पाचा आज फैसला

By admin | Published: October 12, 2016 11:19 PM

खत प्रकल्पाचा आज फैसला

नाशिक : खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानग्यांबाबत काही अटी-शर्ती लादल्याने गेल्या वर्षभरापासून बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे. परंतु, आता महापालिका प्रशासनाने खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव गुरुवारी (दि. १३) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला असल्याने त्यास मंजुरी मिळाल्यास हरित लवादापुढे बाजू मांडणे सोपे जाणार आहे. परिणामी, वर्षभरापासून रखडलेला बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या निर्णयाकडे बांधकाम व्यावसायिकांसह गृहखरेदी करणाऱ्या ग्राहकांचेही लक्ष लागून आहे.खतप्रकल्पाची योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानग्यांना रोख लावला आणि त्यासाठी काही अटीही घातल्या. नोव्हेंबर २०१५ पासून बांधकाम परवानग्या या अटी-शर्तींवर दिल्या जात असल्या तरी त्यांची पूर्तता करणे अवघड असल्याने शहरातील हजारो प्रकरणे परवानग्यांविना प्रलंबित आहेत. महापालिका प्रशासनाने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्यासाठी देण्याकरिता प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन पुण्याच्या मेलहेम आयकॉस एन्व्हायर्मेंट प्रा. लिमिटेड या कंपनीस ३० वर्षे कालावधीसाठी घनकचरा प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचे काम देण्याबाबतचा प्रस्ताव आहे. गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे पडून राहिलेल्या या प्रस्तावाला अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चालना दिली आणि तो मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १३) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे. मागील आठवड्यातच राष्ट्रीय हरित लवादाने लादलेल्या जाचक अटींमुळे शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून, त्यातून मुक्ती मिळण्यासाठी खतप्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांना खतप्रकल्पाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार, गुरुवारी खतप्रकल्पाच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. स्थायीने मान्यता दिल्यास खतप्रकल्प सुरळीत चालू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाकडेही महापालिकेला आपली बाजू मांडणे सोपे जाणार आहे. परिणामी, लवादाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्थात त्यासाठी आणखी सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)