शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

संसदेचे आजपासून ‘वादळी’ अधिवेशन

By admin | Published: July 16, 2017 11:36 PM

संसदेचे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेचे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या, काश्मीर, सिक्किममधील तणाव, शेतकऱ्यांचे आंदोलन, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन होत असलेली कारवाई या मुद्यावरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात काही विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात येईल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉंगे्रसने स्पष्ट केले की, चीनसोबतचा सिमा वाद, काश्मीरातील तणाव, गोरक्षकांचा हिंसाचार यावरुन सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, सिक्किममध्ये चीनमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी त्यांनी चीनला जबाबदार ठरविले. सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आझाद म्हणाले की, ही परिस्थिती चीनने निर्माण केली आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही तो संसदेत मांडू. तृणमूलने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. आझाद म्हणाले की, सरकारने चर्चेचे सर्व मार्ग बंद केले आहेत. काश्मीरात राजकीय घुसमट होत आहे. सभागृहाच्या कामकाजात काँग्रेस विघ्न आणणार नाही. पण, सरकारने विविध मुद्यांवर चर्चेसाठी पुढे यावे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे.