शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Coronavirus : देशभरात टोलवसुलीला सुरुवात, मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून पैसे वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 8:17 AM

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० एप्रिलपासून देशातील काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, देशभरात २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, शेतीसंदर्भातील आणि काही उद्योग सुरू करण्यात येत आहेत. त्यातच, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच टोलवसुलीला सुरुवात केली आहे. राज्यातील वाशीजवळील महामार्गावरही मध्यरात्रीपासूनच टोलवसुली सुरु झाली आहे. दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक टोलनाक्यांवर रात्रीच वाहनांकडून टोलवुसली करण्यात आली.  

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत. त्यानुसार, राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील सर्व टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. तसेच, रस्ते आणि महामार्ग विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार देशभरात टोलवसुली सुरु झाली असून २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सध्या केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक होत आहे, त्याच वाहनांना आंतरजिल्हा, आंतरराज्य सीमांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय, पोलीस परवानगीने अत्यावश्यक आणि अतिदक्षता व महत्वाच्या प्रसंगीच सर्वसामान्य नागरिकांना वाहतूकीचा परवानगी देण्यात आली आहे. 

सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणे सोपे झाले होते. लॉकडाउनच्या काळात सर्व सेवा बंद होत्या. मात्र, आता देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी २० एप्रिलपासून सवलत देण्यात येत आहे. तसेच काही भागात काही अटी लागू करून उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, २० एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईdelhiदिल्ली