शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 8:50 PM

सर्व्हेक्षणात समोरी आली रंजक आकडेवारी, वाचा सविस्तर

Tomato Prices: गेल्या तीन आठवड्यांत देशातील विविध शहरांमध्ये टोमॅटोच्या दरात अनेक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. 'लोकलसर्कल'च्या सर्वेक्षणात टोमॅटोची खरेदी आणि वापर याबाबत एक रंजक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की 46 टक्के कुटुंबे आता टोमॅटोसाठी 150 रुपये किलोपेक्षा जास्त दर देत आहेत. तर 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणेच बंद करून टाकले आहे. याशिवाय, 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केला आहे.

टोमॅटोचे भाव अचानक वाढले

राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव 24 जूनला 20-30 रुपये प्रति किलोवरून 180 रुपये किलो झाले. काही प्रकारचे किंवा चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची किंमतही 220 रुपये किलोवर गेली. इतर शहरांमध्ये आणि तामिळनाडू आणि केरळसारख्या देशातील काही राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव आजही 180 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. टोमॅटोचे काही दर्जेदार प्रकार (top quality) तर त्याहूनही महागात विकले जात आहेत. 'देशी' टोमॅटोचे भाव काही शहरांमध्ये 180-250 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर संकरित (Hybrid) आणि हिरव्या रंगाच्या टोमॅटोचे दर स्वस्त आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 150 ते 180 रुपये प्रति किलो या दराने संकरित आणि हिरव्या जातीचे टोमॅटो विकले जात आहेत.

ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल अँग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (ANCCF) यांना एकाच वेळी प्रमुख उपभोग केंद्रांवर वितरणासाठी टोमॅटोची खरेदी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, मर्यादित उपलब्धता असूनही, शुक्रवारपासून (१४ जुलै) दिल्लीत टोमॅटो ९० रुपये किलोने विकायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, लोकलसर्कल सर्वेक्षणाने भारतातील 342 जिल्ह्यांतील नागरिकांकडून 22,000 हून अधिक प्रतिसाद गोळा केले. यामध्ये 65 टक्के पुरुष आणि 35 टक्के महिला होत्या. 42% लोक हे टियर 1 मध्ये, 34% लोक हे टियर 2 मध्ये आणि 24% लोक हे टियर 3, 4 आणि ग्रामीण जिल्ह्यांतील होते. सर्वेक्षण केलेल्या 87% ग्राहकांनी सांगितले की ते त्यांच्या नवीन खरेदी दरम्यान टोमॅटोसाठी प्रति किलो 100 रुपये जास्त देत आहेत.

अनेकांनी टोमॅटो वापरणं केलं बंद

100 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दर देणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी 27 जून रोजी 18% वरून 14 जुलै रोजी 87% पर्यंत वाढली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केल्याचे सांगितले तर 14 टक्के कुटुंबांनी सध्या टोमॅटो विकत घेणेच बंद केले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खाणे बंद केल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर 35 टक्के लोकांनी वापरात लक्षणीय घट झाल्याचे सांगितले आहे. 33 टक्के लोकांनी ते अंशतः कमी केले आहे आणि केवळ 16 टक्के लोकांनी वापर सामान्य ठेवला आहे. काही लोकांनी टोमॅटो खरेदी करण्यासाठी अधिक पैसेही दिले आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याdelhiदिल्ली