शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

भीषण अपघात! नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 11:07 AM

नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी खंडवा जिल्ह्यातील मेरापाणी गावातील लोक हरदा जिल्ह्यातील रोलगाव येथून नवस पूर्ण करून गावाकडे परतत होते. 

खिरकीया ते छनेरा दरम्यान धनोरा गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ती उलटली. या अपघातात तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर प्रवाशांच्या मदतीने जखमींना तातडीने सार्वजनिक आरोग्य केंद्र खिरकीया येथे नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. 18 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी तीन जखमींना खांडवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

हरदाचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक खिरकियाला पाठवण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तर पाच ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात खंडवा जिल्ह्यातील छनेरा पोलीस ठाण्याच्या धनोरा गावाजवळ घडला, मात्र तेथून आरोग्य केंद्र खिरकीया जवळ असल्याने सर्व जखमींना येथे उपचारासाठी आणण्यात आले. 

अपघातात राकेश रतिराम, फूलवती राजाराम, अंजली कमल, निशिता रतन, सुंदर मुन्ना, गणेश शंकर, जय सिंह रामसिंह, पतिराम गोगाराम, राजेश रामसिंह, शमोती मंगलसिंह, सीता मंगल सिंह, भगवती भालसिंह, तुलसा गुलाब, श्याम भाई पतिराम, बेटू सुंदर, कुंवरसिंह मंगलसिंह, नानाबाई मोतीराम, केशु भाई रामसिंह हे जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघात