शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

पि›त रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By admin | Published: July 12, 2016 12:09 AM

पि›त रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

पि›त रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

रद्द गाड्या
५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर, ५९०७५ सुरत-भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर.

सुरत-जळगाव रेल्वे मार्गावरील वळविलेल्या गाड्या
- भोपाळ-रतलाम-गोध्रा-वडोदरा-अहमदाबाद मार्गे वळविलेल्या..
१२८३४ हावडा-अहमदाबाद, १२६५६, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२९०६ , हावडा-पोरबंदर, १२८३३ अहमदाबाद-हावडा, १२९३७ राजकोट-रेवा.

- सुरत-वसई रोड-कल्याण-नाशिक-जळगाव मार्गे वळविलेल्या गाड्या...
११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी, १८५०२ गांधीधाम-विशाखाप˜नम, १९०४५ सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस, १२६५५ अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस, १७०३८ बिकानेर-सिकंदराबाद, १९०५८ वाराणसी-उधना.
रविवारी संध्याकाळी जळगाव कडून गेलेली सुरत पॅसेंजर नंदुरबार येथूनच सोमवारी सकाळी परत आली.

प्रवाशांचे हाल....
जळगाव येथून नंदुरबार, सुरतकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. रविवारी रात्री अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सोमवारी सकाळीदेखील अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर गेले, मात्र तेथे गेल्यावर रेल्वे गाड्या रद्द असल्याची माहिती मिळाल्याने अनेक जण माघारी परतले.

बसेस्ची सोय...
रविवारी रात्री रेल्वे रद्द झाल्याने जळगाव आगारातून जादा बस सोडण्यात येऊन प्रवाशांना रवाना करण्यात आले. यासाठी मध्यरात्री दोन वाजता निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, आगार प्रमुख एस.बी. खडसे यांनी तातडीने उपाययोजना करून रात्रीच एका बसची व्यवस्था केली. या शिवाय सोमवारी जळगाव, अमळनेर आगारातून प्रत्येकी एक व भुसावळ येथून तीन जादा बसेस् सोडण्यात आल्या.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष वार्‍यावर....
जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असताना आपत्ती नियंत्रण कक्षाने सतर्क राहणे गरजेचे आहे, मात्र जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात आलबेल स्थिती दिसून आली. २४ तास कर्मचारी नियुक्त असावे, असे असतानाही सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजेपासून आठ वाजे पर्यंत येथे कोणीच नव्हते. याबाबत माहिती घेतली असता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यालयीन कर्मचारी होते. त्यानंतर येणारे कर्मचारी येण्यापूर्वीच ते निघून गेल्याचा गंभीर प्रकार येथे दिसून आला. रात्री येणारे कर्मचारी सव्वा आठ- साडे आठ वाजता येतील अशी माहिती मिळाली. मात्र या दोन तासात कोणीच नसल्याने जिल्ह्यात काही आपत्ती ओढावल्यास कोठे संपर्क साधावा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. दूरध्वनी करुनही अधिकारी, कर्मचारी येथे नव्हते.