शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 22:10 IST

महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ज्या पद्धतीने काश्मिरमध्ये लागू असलेले कलम 370 हटविले, आता त्याच पद्धथीने PoK परत घेण्यावरही काम सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत असे विधेयक सादर केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होणे निश्चित आहे, असे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत.

काश्मीरी पंडितांसाठी रिझर्व्हेशन! -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केले. या विधेयकात विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी 2 जागा राखीव ठेवण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, उपराज्यपाल कश्मिरी पंडित समुदायातील 2 सदस्यांना नॉमिनेट करू शकतील. PoK विस्थापितांसाठीही जम्मू काश्मीर असेम्बलीमध्ये आरक्षणाची तरतुदही करण्यात आली आहे. तेथे, एलजी त्यांच्या वतीने 1 सदस्य नॉमिनेट करू शकतील.

'एका देशात दोन पंतप्रधान आणि दोन संविधान कसे'? -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयके सादर केली. यातील पहिले म्हणजे, 'जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023' आणि दुसरे म्हणजे, जम्मू काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023'. विधेयक मांडताना गृहमंत्री म्हणाले, एका देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कसे असू शकतात? ज्यांनी हे केले त्यांनी चूक केली. पंतप्रधान मोदींनी ते दुरुस्त केले. देशात एक प्रधान, एक निशाण आणि एकच विधान असावे, असे आम्ही 1950 पासून म्हणत आलो आहोत.

'आम्ही इतिहासातील चूक दुरुस्त केली' -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'आम्ही देशात एक पंतप्रधान, एक ध्वज आणि एक संविधान केले. आम्ही इतिहासातील चुका दुरुस्त केली.' जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयकात काश्मिरी पंडितांसाठी विधानसभेत 2 जागा आणि पीओकेमधून विस्थापितांसाठी 1 जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांवर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'ते प्रत्येक संस्थेची पायमल्ली करत आहेत' -महेबुबा मुफ्ती यांनी आरोप केला की, असे सर्व कायदे अवैध आहेत. संविधानातील कलम 370 बेकायदेशीरपणे रद्द केले गेले आहे आणि हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. जेव्हा असे एखादे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असताना, सरकार त्यावर कायदा कसा बनवू शकते. हे बेकायदेशीर आहे. ते संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली करत आहेत. ते देशातील प्रत्येक संस्थेची पायमल्ली करत आहेत.' 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाParliamentसंसदJammu Kashmirजम्मू-काश्मीर