गेल्या काही दिवसापूर्वी महाकुंभमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली होती. अचलताल येथील मंगळवारी रात्री, अचलताल येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यालयाच्या गेटवर कोणीतरी धमकी देणारे पत्रके ठेवली. यामध्ये अभाविप, भाजप, आरएसएस यांच्यासाठी अपशब्द वापरले आहेत.
बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर ताशी २८० किमी वेगाने ‘वंदे भारत’ धावणार? पाहा, रेल्वेचा मेगा प्लान
पत्रकांवर देशविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत, एका पत्रकात असेही लिहिले आहे की, महाकुंभात लागलेली आग ही फक्त एक झलक होती.पिक्चर अजून बाकी आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी पोलीस ठाणे गाठले आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अभाविपचे महानगर मंत्री शैलेंद्र प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ०८:३० वाजता ते कार्यालयात आले तेव्हा गेट बंद होता. गेटवर दारावर दोन कागद अडकले होते. यात शिवीगाळ करण्यासोबतच, विद्यार्थी परिषद, आरएसएस आणि भाजप यांच्यासाठी एकत्रितपणे असभ्य भाषा वापरली होती.
संघटनेच्या मुलींविरुद्ध, कार्यकर्त्यांविरुद्ध आणि संपूर्ण समाजाविरुद्ध अपमानास्पद शब्द लिहिले आहेत. धार्मिक चिन्हांचा वापर करून, अभाविप, भाजप, आरएसएस आणि भारत या चिन्हांवर क्रॉस लावण्यात आला आहे. या पत्रात एबीव्हीपी, आरएसएस आणि भाजपला एएमयूमध्ये प्रवेश करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यानंतर शैलेंद्र, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकुर शर्मा, महानगर संघटन मंत्री सौरभ राठोड, राज्य माध्यम समन्वयक अरुण शर्मा, जतिन, पूरण यादव, प्रशांत सिंह, आशुतोष यादव, पियुष भारद्वाज, सौरभ सिंह, विपिन दिवाकर, जतिन आर्य, गगन पंडित आणि इतर कार्यकर्ते गांधीपार्क पोलीस स्टेशन गाठले. तिथे पोहोचून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शैलेंद्र यांनी तक्रार दाखल केली.