शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:58 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता.

- समीर परांजपेयंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद््ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता. तर आपला बालेकिल्ला सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात पूर्वीपेक्षा आक्रमक पवित्रा घेतला. या संघर्षाचे प्रतिबिंब निकालात पाहायला मिळत असून, पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांपैकी तृणमूल काँग्रेस २३, भाजप १८ जागांवर तर काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्यांची मक्तेदारी ममता बॅनर्जी यांनी संपुष्टात आणली होती. आक्रमक नेतृत्वशैली असलेल्या ममतांनी दाखविलेल्या विकासाच्या स्वप्नांची बंगाली माणसाला भुरळ पडली. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत राज्याची अपेक्षित प्रगती होत नसल्याने तेथील सामान्य माणसे दुसऱ्या सशक्त पर्यायाच्या शोधात होती. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे नाममात्र अस्तित्व उरले आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप पुढे सरसावला.या राज्यात पाय रोवण्यासाठी तृणमूल काँग्रेसशी संघर्ष करणे अपरिहार्य होते. एके काळी एनडीएचा घटक पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस नंतर राजकीय मतभेदांमुळे या आघाडीपासून दूर गेला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय नाराज आहेत. पश्चिम बंगालमध्ये शारदा व अन्य चीट फंडांचा काही हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचा भाजपचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे आहे. कोलकाताचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकालाच जेरबंद करण्याची अभूतपूर्व कृती ममता बॅनर्जी सरकारने केली. लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतला होता. ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात एकमेकांवर वैय क्तिक स्वरूपाची टीका केली. फोनी वादळासंदर्भात बंगालमधील स्थिती जाणून घेण्यासाठी मोदींनी केलेला फोनही ममतांनी घेतला नाही. मोदींची कार्यशैली, त्यांनी न पाळलेली आश्वासने यांच्यावर ममतांनी कोरडे ओढले होते. तर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत असा प्रहार मोदी भाषणांतून करत होते.कोलकातात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोच्या वेळी तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली. या गोष्टींमुळे पश्चिम बंगालमधील वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला त्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. डाव्या पक्षांची मतेही भाजपकडे वळल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या राज्यात २०२१ साली विधानसभा निवडणुका असून त्यात ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

>निकालाची कारणेममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पश्चिम बंगालचा विकास विकास होत नसल्याचा भाजपचा प्रचार सामान्य मतदारांना पटू लागला होता.त्रिपुरानंतर पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज करणे हे उद्दिष्ट भाजपने मनाशी धरले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसविरोधात भाजपने पद्धतशीरपणे रान पेटविले.डावे, काँग्रेस हे या राज्यात क्षीण असल्याने तृणमूल व भाजपमध्येच खरी लढत झाली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019