शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी

By admin | Published: April 17, 2017 3:26 AM

मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

भुवनेश्वर : मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.भाजपाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सामाजिक न्यायावर भर देताना पंतप्रधानांनी ट्रिपल तलाकचा उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र सफल करण्यासाठी मुस्लिमांमधील मागास वर्गांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मुस्लीम भगिनींनाही न्याय मिळायला हवा व त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असे मोदी म्हणाले. गडकरींच्या सांगण्यानुसार, पंतप्रधान असेही म्हणाले की, कोणाचीही पिळवणूक होता कामा नये. (ट्रिपल तलाकवरून) मुस्लीम समाजात संघर्ष व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. समाजात काही कुप्रथा असतील, तर त्याविषयी समाजात जागृती निर्माण करून त्यांना (मुस्लीम महिलांना) न्याय देण्याचे काम करावे लागेल.अलीकडच्या निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांमध्ये गडबड केल्याचे विरोधकांनी भाजपावर केलेले आरोप साफ फेटाळून लावताना मोदी म्हणाले की, खास करून दिल्ली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे वाद मुद्दाम निर्माण केले जात आहेत. असे वाद तयार करण्याचा त्यांच्याकडे जणू कारखानाच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चवरील हल्ल्यांचा, बिहार निवडणुकीच्या वेळी ‘पुरस्कार वापसी’चा व आता मतदानयंत्रांचा वाद निर्माण केला जात आहे. (वृत्तसंस्था)बोलताना काळजी घ्यासार्वजनिक वक्तव्ये करताना काळजी घ्या आणि भावनेच्या आहारी जाऊन अनुचित विधाने करू नका, अशी समज भाजपाच्या नेत्यांना देताना मोदी म्हणाले की, तुमच्या काही तक्रारी व गाऱ्हाणी असतील तर तो विषय पक्षात मांडा व पक्षातूनच तो माझ्यापर्यंत पोहोचेल.यशाने हुरळून जाऊ नकाअलिकडेच झालेल्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पक्षाने असाच जोर कायम ठेवायला हवा, असे सांगून मोदी म्हणाले की, लोकसभेच्या ज्या १२० जागा सध्या भाजपाकडे नाहीत त्याही जिंकण्यासाठी पक्ष विशेष मोहीम हाती घेणार आहे. पक्षाच्या यशात पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. निष्णात व्यूहरचनाकार म्हणून ते एक आदर्श आहेत, अशी त्यांनी स्तुती केली.विनाकारण तलाक देणाऱ्यांवर बहिष्कारनवी दिल्ली: मुस्लिम धर्मशास्त्रात दिलेल्या कारणांखेरीज अन्य कारणांसाठी पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात यावा, असे अ.भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ठरविले आहे.तलाक हा मुस्लिमांच्या धर्मशास्त्राशी निगडित विषय असल्याने तो त्यांचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे यात बाहेरच्या कोणालाही हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, असे बोर्डाच्या कार्यकारिणी बैठकीत ठरविण्यात आले.मात्र ट्रिपल तलाकचा पर्याय अगदीच अपवादात्मक प्रकरणांंमध्ये वापरला जाईल, याची खात्री करण्यासाठी समाजाच्या पातळीवर काही व़्यवस्था केली जाईल. ट्रिपल तलाकचा जे दुरुपयोग करतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना दंड करण्याचेही कार्यकारिणीने ठरविले, असे बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद आर. फिरंगी यांनी सांगितले.राम जन्मभूमी वादात कोर्टबाह्य तडजोड नाहीअयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादात आपसात चर्चा करण्याची सर्वोच्च न्यायालयाने केलेली सूचना आम्हाला मान्य नाही. आम्ही फक्त न्यायालय देईल तोच निर्णय मान्य करू, असा ठरावही बोर्डाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला.