शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

मोदींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

By admin | Published: March 20, 2016 4:00 AM

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत शनिवारी सुरू असून, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत शनिवारी सुरू असून, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला. आसाममध्ये सत्ता मिळवणे आणि अन्य राज्यांत ताकद वाढवणे यादृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे. बैठकीचा समारोप रविवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणाने होणार होता. मात्र शनिवारी दुपारच्या सत्रानंतर पंतप्रधान अचानक बैठकीला आले. पक्ष बळकट झाला तरच केंद्र आणि राज्यातील सरकारे मजबूत होतील. त्यामुळे संघटना बांधणीला आणि वाढीला प्राधान्य दिले जावे, असे आवाहन त्यांनी केले.मोदी सरकारचे तिसरे बजेट, आसाम, केरळ, तामिळनाडू, प.बंगाल व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुका, वर्षभराने उत्तरप्रदेश आणि पंजाबात व्हावयाच्या निवडणुका, राजकीय सद्यस्थिती, पक्षाचे संघटन, जेएनयू प्रकरणानंतर पक्षाची भूमिका, अशा विविध विषयांवर या बैठकीत विचार मंथन होणार आहे. संघटन सचिव रामलाल व महासचिव भूपेंद्र यादव यांनी बैठकीसाठी राजकीय व आर्थिक प्रस्ताव तयार केले आहेत. राजकीय प्रस्तावात पक्षाला अभिप्रेत असलेल्या प्रखर राष्ट्रवादाची झलक आहे तर आर्थिक प्रस्तावात अर्थसंकल्पातील तरतुदींचे समर्थन आहे. ग्रामीण भाग व शेतकऱ्यांविषयी मोदी सरकार किती संवेदनशील आहे, याचा संदेश देशभर गावोगावी पोहोचावा, हा या प्रस्तावांचा उद्देश आहे. जेएनयू आणि भारत माता की जय घोषणेला ओवेसीकृत विरोध प्रकरणानंतर पक्षाला अभिप्रेत राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह या विषयावरही व्यापक चर्चा बैठकीत होणार आहे. पक्षाध्यक्षपदी अमित शाह यांची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. (विशेष प्रतिनिधी)भाजपने आसाम व केरळ या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बैठकीत या दोन राज्यांच्या रणनीतीवर प्रामुख्याने चर्चा होईल.परदेश दौरे करून पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय नेत्याच्या भूमिकेत स्वत:ला स्थापित केले. आता ग्रामीण भागाला साद घालत, शेतकरी व दलितांचा नेता अशी नवी प्रतिमा ते बनवू इच्छित आहेत. ‘सूट बूट की सरकार’ या राहुल गांधींच्या टीकेला छेद देणे हा उद्देश तर आहेच, शिवाय पंजाब व उत्तरप्रदेशच्या निवडणुकांसाठीही इमेज मेकओव्हरची मोदींना गरज वाटत आहे. बहुदा त्यामुळेच पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी या बैठकीला येण्याऐवजी दिल्लीतील कृषी उन्नती मेळ्याला हजेरी लावली. येत्या दोन महिन्यातही मोदी अधिकांश वेळ शेतकरी व दलितांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये दिसावेत, याच पद्धतीने देशभर सरकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ते २१ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपात पंतप्रधानांच्या या बदलत्या प्रतिमेचा प्रभाव पक्षाला व देशाला घडेल, अशी शक्यता आहे.