शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

टुरिझम हवाय की टेररिझम ?

By admin | Published: April 03, 2017 6:56 AM

टुरिझम हवाय की टेररिझम, याचा निर्णय काश्मिरी तरुणांनी घ्यायचा आहे

सुरेश भटेवरा,उधमपूर- टुरिझम हवाय की टेररिझम, याचा निर्णय काश्मिरी तरुणांनी घ्यायचा आहे. पहिला मार्ग आर्थिक सुबत्ता वाढवणारा आहे, तर दुसरा मार्ग जम्मू काश्मीरचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा. तरुणांनी साथ दिली, तर काश्मीरचे भाग्य बदलल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.चेनानी-नाशिर या सर्वात लांब बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर, विराट जाहीर सभेत पंतप्रधानांनी अनेक नाजूक विषयांना स्पर्श करीत उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग उपस्थित होते.काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या दगडफेकीचा उल्लेख करीत, मोदी म्हणाले की, दगडाची किंमत मला माहीत आहे. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बोगदा निर्माण करण्यासाठी जम्मू काश्मिरातले ९0 टक्के तरुण तीन वर्षे दिवस-रात्र दगड फोडीत होते. हा बोगदा जम्मू आणि श्रीनगरमधील भौगोलिक अंतरच नाही, तर दोन भागांतल्या जनतेच्या मनातले अंतरही दूर करणारा आहे. दुसरीकडे हातात दगड घेऊ न काश्मीरचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचे काम काही तरुण करीत आहेत. त्यांच्या दहशतीमुळेच येथील पर्यटन व्यवसाय त्यांच्या दहशतीमुळेच थंडावला आहे. मुख्यमंत्री महेबुबा यांनी श्रीनगर खोऱ्यात पर्यटन किती सुरक्षित व आल्हाददायक आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वारंवार या भागाचा दौरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांचेही या प्रसंगी भाषण झाले. मोदींची आजची ही सभा विराट म्हणता येईल, इतकी मोठी होती.राज्यात आणखी ९ बोगदे - गडकरी२0१८ पर्यंत जम्मू-श्रीनगर हे २८९ किलोमीटरचे अंतर २३१ पर्यंत कमी करण्याचे काम सुरू आहे. येथे रस्ते सर्वोत्तम बनवण्यासाठी ६0 हजार कोटींचा खर्च दोन वर्षांत करू. राज्यात आणखी ९ बोगदे तयार होतील.. त्यात लेहजवळ ६ हजार कोटी खर्चाच्या जोजी ला पास बोगद्याचाही समावेश आहे. बोगद्याची संख्या १३ पर्यंत नेण्याचा इरादा आहे जम्मूमध्ये ३१00 कोटी आणि श्रीनगरमधे २२00 कोटी रिंग रोडसाठी खर्च होणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटन आणि रोजगार वाढेल व राज्याचा विकासही वेगाने होईल. >केंद्र सरकार तुमच्या पाठिशी पर्यटकांना एकदा तरी काश्मीरला जावे, असे वाटते. त्यांची भीती दूर करण्याची जबाबदारी इथल्या तरुणांवर आहे. गेली ४0 वर्षे दहशतवादाने राज्याला ग्रासले. त्यातून पदरात काही पडले नाही. भूतकाळात जे घडले, ते बदलण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यासाठी केंद्र सरकार तुमच्या पाठिशी आहे. राज्याच्या विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ८0 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज देऊ केले. त्यातली निम्मी अधिक रक्कम कामांवर खर्च झाली आहे, असे ते म्हणाले. मोबाइलचे फ्लॅश चमकवून... भाषणाच्या सुरुवातीलाच मोबाइलचे फ्लॅश चमकवून जनतेनेच बोगद्याचे उद्घाटन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या वेळी हजारो तरुण ‘मोदी मोदी’ घोषणांचा गजर करीत मोबाइलचे फ्लॅश चमकवीत होते. आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या एक पाऊ ल पुढे जात, अत्याधुनिक सुविधांनी युक्त बोगद्याचे शिल्प घडवल्याबद्दल नितीन गडकरी व त्यांच्या साऱ्या टीमची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.