शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

खादी ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच दीड लाख कोटी रुपयांवर; ‘मन की बात’मध्ये PM मोदींचा संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 6:29 AM

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात पंतप्रधान मोदी यांंनी जनतेला संबोधित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खादी ग्रामोद्योगची उलाढाल पहिल्यांदाच दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे आणि खादी आणि हातमागाच्या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले. 

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात मोदी म्हणाले की, ज्यांनी पूर्वी कधीही खादी उत्पादने वापरली नाहीत, तेही आज मोठ्या अभिमानाने खादी वापरतात. देशवासीयांना खादीचे कपडे खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताच्या ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. गणित ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आसामच्या ‘मोइदाम्स’चा समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

‘भारत अमली पदार्थमुक्त करा’

अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित काळजी व्यक्त केली. भारत अमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना मदत करण्यासाठी ‘मानस’ची हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून सरकारने १९३३ हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. 

विक्रीत ४०० टक्के वाढ

खादीची विक्री ४०० टक्के वाढली आहे. देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि स्त्रिया याच्याशी सर्वाधिक जोडलेल्या असल्याने त्यांचा सर्वाधिक फायदाही होत आहे. लाेकांनी या वर्षापासूनच खादीचे कपडे खरेदी करायला सुरुवात करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्वाधिक वाघ भारतात असल्याचा अभिमान

जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याचे अधोरेखित करून ते म्हणाले की याचा आम्हाला अभिमान आहे. हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार