शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"संजय रॉयला फाशी देऊ नका"; पीडितेच्या कुटुंबियांना कोर्टात सांगितलं, "मुलीचा मृत्यू झालाय म्हणून त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:27 IST

RG Kar Case: आरजी कार प्रकरणात दोषी असलेल्या संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयात ...

RG Kar Case: आरजी कार प्रकरणात दोषी असलेल्या संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यासंदर्भात दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आरजी कार बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेत संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आता संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयात एक ट्विस्ट आला आहे.

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी एका ३२ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजय रॉयला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी पश्चिम बंगाल सरकारची आणि पीडितेच्या कुटुंबियांची मागणी होती. मात्र तसा निर्णय न झाल्याने पश्चिम बंगाल सरकारने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमवारी या प्रकरणी सुनावणी पार पडलीय.

मात्र आता पीडितेचे कुटुंबिय गुन्ह्यात दोषी असलेल्या संजय रॉयला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करत नसल्याचे समोर आलं आहे. पीडितीचे वकील गार्गी गोस्वामी यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाला त्यांची भूमिका कळवली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारपेक्षा स्वतंत्र विनंती केली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी संजय रॉय आणि सरकारचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. 

राज्य सरकार आणि सीबीआय आरजी कर प्रकरणात फाशीची मागणी करत आहेत. संजय रॉयच्या शिक्षेबाबत आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचा अर्ज पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणातील अन्य दोषींवर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. "फक्त त्यांच्या मुलीने आपला जीव गमावला म्हणून याचा अर्थ गुन्हेगारालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागेल असे नाही," असे गोस्वामी यांनी न्यायालयात पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने सांगितले.

पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल किशोर दत्ता यांनी बाजू मांडली. त्यांनी असा युक्तिवाद केला की ट्रायल कोर्टाचा निकाल अपुरा होता. दत्ता यांनी अशा कायद्याचा उल्लेख करत अशा प्रकरणांमध्ये शिक्षेविरुद्ध अपील करण्याची परवानगी देतो, असं सांगितले.

"सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी असे म्हटले होते की अशा प्रकरणांमध्ये केवळ केंद्र सरकारच अपील करू शकते, परंतु एका दुरुस्तीत स्पष्ट केले आहे की राज्ये देखील कठोर शिक्षेची मागणी करू शकतात," असं दत्ता म्हणाले. या प्रकरणात राज्याचे प्रतिनिधित्व मजबूत करण्यासाठी दत्ता यांनी सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंतीही केली. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग