शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Twitter Reply To Rahul Gandhi: 'माझा आवाज दाबला जातोय'; राहुल गांधींच्या आरोपानंतर ट्विटरने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 12:34 IST

Twitter Reply To Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला पत्र लिहून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला (Twitter) पत्र लिहून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या दबावाखाली माझा आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर माझ्या फॉलोअर्सची संख्या कमी केली जात आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता ट्विटरकडून स्पष्टीकरण आले आहे.

यावर ट्विटरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, "फॉलोअर्सची संख्या हे व्हिजिबल फीचर आहे आहे. फॉलोअर्सची आकडेवारी अचूक आहे, यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा असे आम्हाला वाटते. ट्विटरचा युज आणि स्पॅमबाबत ट्विटरची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. आम्ही मशीन लर्निंग टूल्सच्या मदतीने विश्वासार्हता राखण्यासाठी व्यापकपणे स्पॅमशी लढा देत आहोत. यादरम्यान फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात'', असे ट्विटरने म्हटले. 

ट्विटरने पुढे म्हटले की, ''आम्ही हेरगिरी आणि स्पॅमवरील आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे दर आठवड्याला लाखो खाती डिलीट करत आहोत. अधिक तपशीलांसाठी तुम्ही ट्विटरच्या नवीन ट्रांसपेरंसी सेंटर अपडेटवर एक नजर टाकू शकता. काही खात्यांमध्ये थोडाफार फरक असला तरी काही प्रकरणांमध्ये संख्या जास्त असू शकते'', असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी ट्विटरचा "अनावश्यक सहभाग" आहे. सरकारी मोहिमेबाबत ट्विटरवर आवाज दाबला जात आहे. 27 डिसेंबरच्या पत्रात त्यांच्या ट्विटर खात्यावरील डेटाचे विश्लेषण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी तुलना करण्यात केली. त्यात राहुल गांधी म्हणाले की, 2021 च्या पहिल्या सात महिन्यांत त्यांच्या खात्यात सरासरी 4 लाख फॉलोअर्स जोडले गेले. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आठ दिवसांच्या स्थगितीनंतर ही वाढ अचानक अनेक महिने थांबली.

याच काळात इतर राजकारण्यांच्या फॉलोअर्सची संख्या अबाधित राहिली. मला काही लोकांकडून कळवण्यात आले आहे की ट्विटर इंडियावर माझा आवाज बंद करण्यासाठी सरकारचा प्रचंड दबाव आहे. माझे खाते काही दिवसांसाठी वैध कारणाशिवाय ब्लॉक करण्यात आले. सरकारसह ट्विटरवर ज्यांनी तत्सम छायाचित्रे ट्विट केली, त्यापैकी एकही अकाऊंट ब्लॉक करण्यात आले नव्हते. फक्त माझे खाते टार्गेट करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटरParag Agrawalपराग अग्रवाल