शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भुरट्या चोरांचा उच्छाद, वर्षभरात रेल्वेतून चोरीस गेले दोन लाख टॉवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:11 IST

रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे.

मुंबई - रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे. गेल्या आर्थिक वर्षात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सुमारे एक लाख 95 हजार टॉवेल चोरीस गेली आहेत. इतकेच नाहीतर 81 हजार 736 चादरी,  55 हजार 573 उशांची कव्हरे, 5 हजार 038 उशा आणि 7 हजार 043 पांघरुणांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून चोरीस जाणाऱ्या सामानामध्ये 200 टॉयलेट मग, एक हजार टेप आणि 300 हून अधिक फ्लश पाइपचाही समावेश आहे. सोमवारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात रतलामला जाणाऱ्या एका व्यक्तीला 3 पांघरुणे, 6 चादरी आणि तीन उशा चोरल्याच्या आरोपाथाली अटक करण्यात आली होती.दरम्यान, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात रेल्वेमधून 79 हजार 350 टॉवेल, 27 हजार 545 चादरी, 21 हजार 50 उशांची कव्हरे 2 हजार 150 उशा आणि 2 हजार 65 पांघरुणे चोरीस गेली आहेत. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल 62 लाख रुपये एवढी आहे.   गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये रेल्वेला सुमारे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रेल्वेत होणाऱ्या किरकोळ चोऱ्यांमुळे झाले आहे. रेल्वेतून चादरी आणि अन्य वस्तूंच्या चोरीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोच अटेंडेंटला करावी लागते, तर बाथरूममधील सामानाच्या नुकसानीची भरपाई रेल्वे करते. रेल्वेत वापरण्यात येणाऱ्या बेडशीटची किंमत 132 रुपये, टॉवेल 22 रुपये आणि उशीची किंमत 25 रुपये असते. मात्र प्रवाशांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या वस्तू पुन्हा रेल्वेकडे येत नाहीत.सेंसर टेप आणि सीसीटीव्हीसारख्या सुविधा उपलब्ध असूनही वस्तू चोरीस जातात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेThiefचोरcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वे