शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

पैसे वाचवण्यासाठी त्या दोघांनी लढवली शक्कल, एअर इंडियाची झाली पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:08 PM

दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली.

जोधपूर -  दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली. या दोन प्रवाशांना जोधपूर या ठिकाणी जायचं होतं मात्र मुंबई ते जोधपूर हा विमान खर्च परवडत नसल्याने त्यांनी मुंबई ते जयपूर या विमानाचे स्वस्त तिकीट घेतले. नियोजित वेळेनुसार मुंबई ते जयपूर या विमानाने उड्डाण घेतले. एअर इंडियाचे हे विमान जोधपूरमार्गे जयपूरला जाणार होतं. 

काही वेळानंतर विमान जोधपूर रनवे उतरण्यात आलं. जोधपूरपर्यंत जाणारे सर्व प्रवाशी विमानातून खाली उतरत होते. या प्रवाशांच्या रांगेमधून हळूच कोणालाही न कळता ते दोन प्रवाशी जोधपूर एअरपोर्टला उतरुन निघून गेले. मात्र काही क्षणात हे विमान जयपूरसाठी रवाना होणार होते. तेव्हा विमानातील जयपूरला जाणारे 2 प्रवाशी गायब झाल्याने विमानामध्ये खळबळ माजली. यानंतर चौकशी करुन त्या दोन प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला. 

एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन करुन पुन्हा येण्यासाठी विनंती केली. मात्र नातेवाईक आजारी असल्याचे कारण देत त्या प्रवाशांनी पुन्हा विमानात येण्यास नकार दिला. मात्र या दोन प्रवाशांच्या कारनाम्यामुळे तब्बल 45 मिनिटे एअर इंडियाचे विमान जोधपूर रनवेवर उभं होतं. गुरूवारी एअर इंडियाच्या विमानाची मुंबई ते जयपूर तिकीट 10 हजार 30 रुपये होती तर मुंबई ते जोधपूर विमानाचा दर 17 हजार 695 रुपये होता. 

नागरी विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाने ज्या ठिकाणापर्यंतची तिकीट घेतली आहे त्याला तिथेपर्यंतचा प्रवास करणे बंधनकारक असतो. या प्रवासादरम्यान जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या प्रवाशाला मध्ये उतरण्याची परवानगी दिली जाते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मध्येच सोडण्याची परवानगी कोणत्याही प्रवाशाला दिली जात नाही. आपत्कालीन परिस्थितीत अंतिम ठिकाणापर्यंत पोहचण्याआधी जवळच्या विमानतळावर लॅंडिग केलं जातं. आणि त्या प्रवाशाला उतरण्याची परवानगी दिली जाते. 

6 ऑगस्ट 2017 रोजी दिल्लीहून जयपूर व्हाया जोधपूर जाणाऱ्या विमानात नेव्हीच्या एका अधिकाऱ्याने जोधपूरला उतरण्याची विनंती केली होती. मात्र एव्हिएशन कंपनीने त्यांना परवानगी नाकारली होती.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाticketतिकिटAirportविमानतळ