शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

लोकसभेतील अँग्लो-इंडियन्सच्या २ राखीव जागा रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 02:53 IST

राज्यसभेत आज विधेयक येणार; ७० वर्षांपासून राष्ट्रपती करीत होते नियुक्त्या

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आणखी दहा वर्षांसाठी राखीव जागा वाढवून देण्याबाबतचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडले जाईल, तेव्हा त्याकडे सर्वांचे लक्ष असेल. या समाज घटकांना राखीव जागांचा लाभ वाढवून देण्यावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत म्हणून या विधेयकाकडे लक्ष असेल, असे नाही. कारण लोकसभेत ते मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर एकमताने संमत झाले आहे. तरीही याच विधेयकात एक मुद्दा आहे.

लोकसभेत अँग्लो-इंडियन समाजासाठी असलेल्या दोन जागा रद्द करण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. देशाने १९५२ मध्ये घटना स्वीकारल्यापासून कलम ३३४ (बी) अंतर्गत अँग्लो इंडियन समाजाचे दोन सदस्य लोकसभेवर नाम नियुक्त केले जात आहेत. या समाजाला ७० वर्षांनंतर या राखीव जागांची गरज नाही याची जाणीव सरकारला झाल्यामुळे अनेक दशकांपूर्वीची ही तरतूद रद्द करण्यात आली आहे.

अँग्लो-इंडियन समाजाच्या सदस्यांसाठीच्या राखीव जागा या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयावर गरज भासल्यास नंतर फेरविचार केला जाईल. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत लोकसभेवर अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य नियुक्त केले गेले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, समाजकल्याण मंत्री थावरचंद गहलोत यांचा समावेश असलेल्या समितीने या दोन नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

संसदेमध्ये अनुसूचित जातीचे ८४ आणि अनुसूचित जमातीचे ४७ सदस्य आहेत. राखीव जागांचा लाभ त्यांना पुढेही मिळत राहील. या निर्णयामुळे राज्यसभेत ते विधेयक संमत झाले तर लोकसभेतील संख्याबळ सध्याच्या ५४५ वरून ५४३ होईल.भारताचे राष्ट्रपती अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य नियुक्त करीत होते. लोकसभेवर ५४३ सदस्य निवडून गेल्यानंतर त्याचे संख्याबळ ५४५ व्हायचे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शहाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू