शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

करणी केल्याच्या आरोपावरून दोन महिलांना जिवंत गाडले

By admin | Published: November 04, 2016 6:17 AM

अंधश्रद्धा आणि चेटूक यासारख्या अतार्किक व अघोरी गोष्टींच्या जबर पगड्याने आसामच्या आदिवासी जिल्ह्यांत तिघींचा हकनाक बळी घेतला आहे.

गुवाहाटी : अंधश्रद्धा आणि चेटूक यासारख्या अतार्किक व अघोरी गोष्टींच्या जबर पगड्याने आसामच्या आदिवासी जिल्ह्यांत तिघींचा हकनाक बळी घेतला आहे. यापैकी एका घटनेत चेटूक केल्याच्या संशयावरून दोन प्रौढ महिलांना जिवंत गाडण्यात आले. दुसऱ्या घटनेत चोरीला गेलेला मोबाईल फोन सापडावा, यासाठी चार वर्षांच्या मुलीचा बळी देण्यात आला.पहिली घटना मध्य आसामच्या नागांव जिल्ह्यातील नहरबारी गावातील आदिवासी पाड्यावर गेल्या सोमवारी घडली. पाड्यावर पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरीत कीडे झाल्याचे आढळले. यामुळेच लोक आजारी पडतात, असा निष्कर्ष काढला गेला. मांत्रिकाने कोणीतरी चेटूक केल्याने विहिरीत कीडे झाल्याचे सांगितले. पाड्यावरील लोकांनी साल्मी गौर (४७ वर्षे) आणि सागू गौर (५९) या दोन महिलांवर चेटूक केल्याचा संशय घेतला. रहिवाशांनी या दोघींना त्याच विहिरीत ढकलून वरून दगड-माती टाकून गाडून टाकले. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी बासू गौर व सानू गौर या दोघांना अटक केली. कुमार सानू गौर या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.>१३२ ‘चेटकिणीं’चा मृत्यूच्खास करून बोडो आणि आदिवासींची वस्ती असलेल्या आसामच्या जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा आणि अघोरी विद्यांचा अशिक्षित लोकांवर जबर पगडा आहे. गावात होणारी रोगराई, मृत्यू वा नापिकी या सर्वांचे खापर चेटूक केले जाण्यावर फोडले जाते. ‘बेज’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मांत्रिकाला बोलावून ‘चेटूक’ करणारी व्यक्ती ‘शोधून’ काढली जाते. नंतर या व्यक्तीचा अनन्वित छळ करून तिला वाळित टाकले जाते वा प्रसंगी ठारही मारले जाते. सरकारी आकडेवारीनुसार सन २००२ ते २०१२ या १० वर्षांत चेटूक करण्याच्या संशयावरून आसाममध्ये १३२ व्यक्तींना ठार मारण्यात आले आहे. यात महिला व मुलांची संख्या अधिक आहे.