शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उद्योग क्षेत्रात वाढले फसवणुकीचे प्रकार! ८९ टक्के कंपन्यांचा अनुभव : सायबर सुरक्षा ही चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 04:22 IST

भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.

नवी दिल्ली : भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.‘क्रॉल अ‍ॅन्युअल ग्लोबल फ्रॉड अ‍ॅण्ड रिस्क’ या अहवालात ही माहिती देण्यात आली. यानुसार, भारतातील फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात आयपी चो-या, पायरसी व बनवेगिरी ३६ टक्के आणि भ्रष्टाचार व लाच याचे प्रमाण ३१ टक्के आहे. गेल्या १२ महिन्यांतील घटनांच्या विश्लेषणानुसार, ४५ टक्के उत्तरदात्यांनी त्यांच्या फसवणुकीला भागीदार जबाबदार असल्याचे सांगितले.गेल्या वर्षी विद्यमान व माजी कर्मचारीच फसवणुकीतील प्रामुख्याने आरोपी होते. यंदा कनिष्ठ कर्मचारी अशा घटनांतील आरोपींमध्ये दुसºया स्थानी आहेत. ४३ टक्के प्रकरणात कनिष्ठ कर्मचारी आरोपी असल्याचे समोर आले आहे. फसवणूक व घोटाळ्यांचा फटका बसलेल्यांची संख्या २0१७ मध्ये २१ टक्क्यांनी वाढून ८९ टक्क्यांवर गेली आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ८४ टक्के आहे. याचाच अर्थ भारतात फसवणुकीचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक म्हणजे सर्वाधिक आहे, असे क्रॉलच्या दक्षिण आशियाच्या व्यवस्थापकीय संचालक रेशमी खुराणा यांनी सांगितले.फसवणुकीमुळे आपल्या कंपनीला एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला, असे अनेक अधिकाºयांनी सांगितले. फसवणुकीमुळे एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसलेल्या देशांत मेक्सिको अव्वलस्थानी आहे. तेथील ३९ टक्के अधिका-यांनी अशी तक्रार केली.सायबर हल्ल्यामुळे बेजार-सायबर सुरक्षा हा चिंतेचा मुद्दा आहे. गेल्या १२ महिन्यांत सायबर हल्ला झाल्याचे त्यांनी मान्य केले. २0१६मध्ये हे प्रमाण ७३ टक्के होते, ते २0१७ साली ६४ टक्के झाले आहे. याचाच अर्थ यंदा त्यात ११ टक्के वाढ झाली आहे. फसवणूक, सायबर व सुरक्षा जोखीम यात वाढ झाल्याचे उत्तरदात्यांनी मान्य केले.