शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

'...तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो, अब की बार भाजपा तडीपार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 20:52 IST

Uddhav Thackeray criticize Narendra Modi: जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. आम्ही जी लढाई लढतोय ती लोकशाही आणि घटनेला वाचवण्यासाठीची लढाई आहे. भाजपाला घटना बदलण्यासाठीच ४०० पार जायचं आहे. मात्र जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की. या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं. संपूर्ण देशात यांचे दोनच खासदार होते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. आता मलाही विचारतात की, तुमच्या किती जागा येतील? यांना विचारलं तर म्हणतात की ४०० पार, काय ४०० पार हे काय फर्निचरचं दुकान आहे. आज देशभरातील नेते इथे आले आहेत. आज जी परिस्थिती आहे, ती महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही जी लढाई लढतोय, ती लोकशाही आणि घटनेला वाचवण्यासाठीची आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत. तुम्हाला माहिती असेलच सध्या रशियामध्ये निवडणुका सुरू आहेत. पण तिथे व्लादिमीर पुतीन त्यांच्याविरोधात कुणीच लढणारा नाही. जे विरोधक आहेत ते तुरुंगात किंवा परदेशात आहेत. पण मी लोकशाही मानतो, निवडणूक घेतलीय, पण विरोधात लढायलाच कुणी नाही. हे अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर अशी वेळ आलीय की, मी म्हणतो देश हाच माझा धर्म, देश वाचला तर आम्ही वाचू, व्यक्तीची ओळख देश असली पाहिजे. व्यक्ती देशापेक्षा मोठं असता कामा नये. कुणीही कितीही मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे. हे आता मोदी सरकार अशी जाहिरात करताहेत, यांच्या डोक्यात आता देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशातील जनतेसमोर हुकूमशाहा कितीही मोठा असला तरी जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४