शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरे ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 17:56 IST

शुक्रवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. या ठरावावर शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबद्दल शिवसेना खासदारांना बोलण्यास मनाई करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. टीडीपीच्या खासदारांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या प्रस्तावाला पन्नासहून अधिक खासदारांचा पाठिंबा असल्यानं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला. या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. मोदी सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानं शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभेतील भाजपाचं संख्याबळ पाहता मोदी सरकारसाठी ही लढाई लुटूपुटूची असेल. भाजपाचे लोकसभेत 273 खासदार आहेत. मित्रपक्षांच्या खासदारांचा आकडा विचारात घेतल्यास ही संख्या 310 वर जाते.एनडीएचे सध्या लोकसभेत 310 खासदार आहेत. यात शिवसेनेच्या 18 खासदारांचा समावेश आहेत. मोदी सरकारविरोधातील एकजूट दाखवण्यासाठी विरोधी पक्ष अविश्वास प्रस्तावाचा वापर करत आहेत. मोदी सरकारसाठी ही लढाई सोपी असली, तरी विरोधकांना यानिमित्तानं आपल्या एकीचं बळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपावर कायम टीका करणाऱ्या आणि सत्तेत राहूनही सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आपल्या बाजूनं ओढण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. त्यामुळे कायम मोदी सरकारवर टीका करणारी शिवसेना शुक्रवारी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदी