शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

UIDAIची 127 आधार धारकांना नोटीस, उद्यापर्यंत सिद्ध करावं लागणार नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 09:21 IST

ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत.

ठळक मुद्देहैदराबाद कार्यालयानं मंगळवारी कथित आणि चुकीच्या पद्धतीनं आधार क्रमांक मिळवणाऱ्या 127 जणांना नोटीस पाठवली आहे. ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत.  UIDAIने 3 फेब्रुवारीला दिलेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, हैदराबादेतल्या प्रादेशिक कार्यालयाला एक तक्रार मिळाली.

नवी दिल्लीः भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा(UIDAI)च्या हैदराबाद कार्यालयानं मंगळवारी कथित आणि चुकीच्या पद्धतीनं आधार क्रमांक मिळवणाऱ्या 127 जणांना नोटीस पाठवली आहे. UIDAIच्या मते, त्यांना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत. UIDAIने 3 फेब्रुवारीला दिलेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, हैदराबादेतल्या प्रादेशिक कार्यालयाला एक तक्रार मिळाली. त्यामुळे त्या संबंधित व्यक्तींना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. त्यांनी चुकीची माहिती देऊन खोटी कागदपत्रं दाखवून आधार नंबर मिळवला आहे, असाही त्यात उल्लेख आहे. आता त्या लोकांना आपलं नागरिकत्व प्रमाणित करावं लागणार आहे.   

  • 20 फेब्रुवारीला सादर होण्याचे निर्देश 

हैदराबाद प्रादेशिक कार्यालयाकडून बर्‍याच वर्षांपासून या प्रकरणाची तपासणी केली जात आहे. या संबंधांत सर्व 127 लोकांना 20 फेब्रुवारीला इन्क्वॉयरी ऑफिसर अमिता बिंदरू यांच्या समोर खरे दस्तावेज दाखवून नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. जर त्यांनी नागरिकत्व सिद्ध केलं नाही, तर त्यांचं आधार कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रं द्यावी लागणार आहेत हे नोटिशीमध्ये सांगण्यात आलं आहे. 

  • रिक्षाचालकाचं आधार खोटं असल्याची तक्रार

हैदराबादेतल्या 40 वर्षीय ऑटो-रिक्षाचालकाला UIDAIनं एका तक्रारीनंतर नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं आहे. तक्रारीत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचं सांगण्यात येत आहे. बायोमेट्रिक्स-आधारित ओळखपत्र प्रणाली चालवणाऱ्या प्राधिकरणाच्या उपसंचालक आणि तपास अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाला 20 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता त्यांच्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.     

  • काय आहे आधार अ‍ॅक्ट?

आधार अ‍ॅक्ट 2016नुसार, आधार हा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करतो. आधार अधिनियमांतर्गत  UIDAIला आधार कार्ड वितरीत करायचं की नाही हे ठरवावं लागणार आहे. एखाद्या व्यक्तीचा अर्ज आल्यानंतर भारतात कमीत कमीत 182 दिवस ती व्यक्ती वास्तव्याला असली पाहिजे. तरच त्याला आधार कार्ड देण्यात येते.  

  • सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश 

सर्वोच्च न्यायालयानं आपल्या ऐतिहासिक निर्णयात यूआयडीएआय (UIDAI)ला अवैध प्रवाशांना आधार कार्ड जारी न करण्याचे निर्देश दिले आहेत.