शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 07:29 IST

अद्यापही अनेक बेपत्ता...

वायनाड : केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून मरण पावलेल्यांची संख्या २१८ वर पोहोचली आहे, तसेच २०६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचावकार्यासाठी लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या जवानांनी सुमारे अविश्रांत परिश्रम करून  चूरालमला येथे १९० फुटांचा एक बेली ब्रिज बांधला. त्या तुकडीचे नेतृत्व मेजर सीता शेळके या मराठमोळ्या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले. 

मुंडक्काई आणि चुरालमला या भागांमध्ये झालेल्या दुर्घटनेत मोठमोठे दगड, माती, चिखल यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेली व त्यात शेकडो लोक अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी बचावकार्य अहोरात्र सुरू आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले आहेत का, याचा झेव्हर रडार आणि चार रिको रडारमार्फत शोध घेतला जात आहे. केरळ सरकारच्या विनंतीवरून ही रडार विशेष विमानाने दिल्लीहून त्या राज्यात आणण्यात आली. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी सुरू असलेले बचावकार्य अंतिम टप्प्यात  आहे. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध दरडींच्या ढिगाऱ्याखाली घेतला जात आहे.

केदारनाथ मार्गावरील दहा हजार लोकांची सुटकाकेदारनाथ मंदिराच्या मार्गावरील उद्ध्वस्त मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्याची मोहीम रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत १०,५०० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर काही लोकांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्यात आले आहे. केदारनाथ, भिंबली आणि गौरीकुंडमध्ये सुमारे १३०० यात्रेकरू अडकले आहेत.

मद्रास इंजिनीअरिंग ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारीमेजर सीता शेळके या लष्कराच्या बंगळुरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारी आहेत. या ग्रुपच्या ७० जवानांच्या टीमने चुरारमला येथे बांधलेल्या बेली ब्रिजचे बांधकाम शेळके यांच्या नेतृत्वाखाली १६ तासांत बांधून पूर्ण केला. दरडीच्या ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या लोकांना उपचारांसाठी तत्काळ हलविण्याकरिता ब्रिजचा मोठा उपयोग होत आहे. तसेच त्याचा वापर करून बचावपथके दुर्घटनाग्रस्त मुंडकाई गावात जलदगतीने पोहोचू शकली. सीता शेळके या २०१२मध्ये भारतीय लष्करात दाखल झाल्या. मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये त्या ग्रुप मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून चेन्नई ओटीए येथून त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. 

२१८ - जणांचा मृत्यू९० -  महिला मृत९८ - पुरुष मृत३० - मुलांचा बळी१५२ - ओळख पटली.५१८ - जण जखमी

सुपरस्टार मोहनलाल यांची ३ कोटी रुपयांची मदत- दरडी कोसळल्यामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी मल्याळी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांनी शनिवारी आपल्या विश्वशांती फाउंडेशनतर्फे तीन कोटी रुपयांची मदत जाहीर केली. - दुर्घटना घडलेल्या मुंडक्काई आणि चूरलमाला, पुंचिरीमट्टम आदी ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

कुठे काय झाले ?- झारखंडमध्ये पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत, झाडे उन्मळून पडली असून, घरांचे नुकसान झाले आहे. एक पूलही कोसळला आहे.- कोलकातामध्ये विमानतळासह अनेक भागांत पाणी साचले.- केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या बिहारमधील व्यक्तीचे नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते.- हिमाचल प्रदेशातील १९० रस्त्यांवर वाहतूक ठप्प. - मध्ये प्रदेशात घर कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू, पाच जण जखमी.- चीनच्या शांक्सी प्रांतात पूल कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३८ वर, दोन डझन लोक अद्याप बेपत्ता आहेत.

टॅग्स :KeralaकेरळRainपाऊसDeathमृत्यू