शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

देशात ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम,राहुल गांधी यांचा घणाघाती हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 7:45 AM

Rahul Gandhi News: देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी सध्या निर्माण झाली आहे. हा सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

 नवी दिल्ली : देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी सध्या निर्माण झाली आहे. भारतामध्ये श्रीमंतांचा व गरीबांचा असे दोन वेगवेगळे भारत वसत आहेत. या दोन भारतांमधील दरी खूप वाढली आहे. हा सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाला होता. त्याच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेत राहुल गांधी म्हणाले की, देशाला भे़डसावणाऱ्या समस्या तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेकारीचा या अभिभाषणात काहीही उल्लेख नव्हता. नोकरशाहीने मांडलेल्या संकल्पनांची जंत्री राष्ट्रपतींच्या अभिभाषणात होती. श्रीमंत व गरीब अशा दोन भारतांतील दरी मिटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे. मात्र त्यांच्या हाताला मोदी सरकारने काम मिळवून दिलेले नाही. त्याऐवजी नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, स्टार्ट-अपबद्दलच भाषणे देतात.

४० टक्के संपत्ती मुठभरांच्या हातीकाँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतातील ४० टक्के संपती मुठभरांच्या हाती एकवटली आहे. ८४ टक्के भारतीयांची कमाई कमी झाली आहे. त्यामुळे गरिबीच्या दिशेने ते ढकलले जात आहेत. देशातील असंघटित कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे मेक इन इंडियाची मोहिम यशस्वी होणार नाही. 

मोदी सरकार करत आहे, आवाज दडपण्याचा प्रयत्नमोदी सरकार संघराज्यातील घटकांचा आवाज दडपण्यासाठी न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, पेगॅसस यांचा वापर करत आहे. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी राजेशाही व्यवस्था नष्ट होऊन लोकशाही आली. पण तीच राजेशाही व्यवस्था भाजप पुन्हा देशात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी