शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

२०२४ पूर्वी समान नागरी, लोकसंख्या नियंत्रय कायदा लागू करा; बाबा रामदेव यांची मोदी सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:40 AM

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे. सरकारने या दिशेने लवकरात लवकर प्रभावी पावले उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, अशी मागणी रामदेव बाबा यांनी केली.

आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर उभारले जावे, हे जनतेचे स्वप्न असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. देशातील कलम-३७० ही हटवण्यात आले. आता फक्त दोनच कामे उरली आहेत.

मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा; सुरतच्या न्यायालयाने निकाल सुनावला

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचे कामही २०२४ पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. नऊ दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी योगगुरू रामदेव यांनी ही मागणी केली. योगगुरू रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या सहवासात पतंजली संन्यासाश्रमाजवळील ऋषीग्राममध्ये नऊ दिवसीय संन्यास दीक्षा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी योगगुरू रामदेव म्हणाले की, राम मंदिरासोबतच या देशाचे राष्ट्रीय मंदिरही उभारले पाहिजे. त्याचबरोबर चारित्र्य घडवायला हवे, व्यक्तिमत्व घडवले पाहिजे आणि दैवी नेतृत्व घडवले पाहिजे. ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम सुरू आहे.

हे सनातनच्या प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे कार्य आहे. जे रामविरोधी, देशद्रोही आहेत, त्यांच्यात खळबळ उडाली आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले. राम मंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, युगाचा धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले.

संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचे अनुष्ठान केले जाईल. सर्व तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत, असंही रामदेव बाबा म्हणाले.

'ऋषींचे वंशज दीक्षा महोत्सवासाठी तयार केले जात आहेत. हे संन्यासी ऋषींचे प्रतिनिधी आणि उत्तराधिकारी असतील. हे संन्यासी सनातन धर्माचा झेंडा जगात फडकवतील. हे संन्यासी पतंजलीचे उत्तराधिकारी देखील होतील, असंही रामदेव बाबा म्हणाले. 

ऋषीग्राममध्ये ६० तरुण आणि ४० तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर उत्सवात ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा दिली जाणार आहे. आचार्य बालकृष्ण या ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा देणार आहेत. संन्यास दीक्षा महोत्सवात सर्व समाजातील तरुण-तरुणींना सुरुवात केली जात आहे, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदी