शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

केंद्र सरकार किमान हमी भावासाठी नेमणार समिती, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 07:47 IST

Farmer News: :तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात मांडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री Narendra Singh Tomar यांनी शनिवारी दिली.

नवी दिल्ली : तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात मांडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शनिवारी दिली.किमान हमी भावासह (एमएसपी) शेतीचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी सरकारतर्फे नेमल्या जाणाऱ्या समितीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश केला जाईल. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे आणि आपापल्या घरी परतावे असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शनिवारी केले.नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, पिकांचे वैविध्य, शून्य बजेट शेती, किमान हमी भाव पद्धती अधिक पारदर्शक बनविणे या मुद्यांसाठी समिती नेमण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. अशी समिती स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची किमान हमी भावाबाबतची मागणीही पूर्ण होऊ शकेल.शेतातील कृषी कचरा जाळल्याबद्दल तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. मात्र, हे गुुन्हे रद्द करणे आणि आंदोलन काळात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाह्य देणे हे विषय राज्य सरकारांच्या अख्यत्यारीत येतात. त्यामुळे संबंधित राज्यांच्या धोरणानुसार त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही कृषिमंत्री म्हणाले. 

आंदोलन सुरूच राहीलआंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केंद्र सरकार सतत करीत असले तरी शेतकरी संघटनांनी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे सुरूच राहील, असे आज पुन्हा स्पष्ट केले. मात्र सोमवारचा संसदेवरील ट्रॅक्टर मोर्चा रद्द करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी केली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर