शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Narendra Modi: गेल्या ७ वर्षात ३ कोटी गरीब लखपती झाले; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजावलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 4:00 PM

आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला आहे असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी बुधवारी अर्थसंकल्प २०२२ यावर भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीबाबत मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प(Union Budget 2022) सादर केला. परंतु हा संकल्प दिशाहिन असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना म्हणाले की, देश मागील १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोना व्हायरस(Coronavirus) या महामारी जगासमोर अनेक आव्हानं घेऊन आली. जगाला त्या टोकाला उभं केले ज्याठिकाणाहून टर्निंग पॉईंट गरजेचा आहे. यापुढे आपण जे जग पाहणार आहोत ते तसं नसणार जसं आपण कोरोना महामारीपूर्वी पाहत होतो असं मोदींनी सांगितले.

जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला

तसेच कोरोनानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर बनणार आहे. त्याचे संकेतही दिसत आहे. आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोकं भारताकडे अधिक मजबूत रुपाने पाहत आहे. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे असं मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले.

भारतात परकीय चलनाचा साठा झपाट्याने वाढला

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारताचा जीडीपी २ लाख ३० हजार कोटींच्या आसपास आहे.सध्या भारताचं परकीय चलन साठा $६३० अब्ज पार झाला आहे. २०१३-१४ मध्ये भारताची निर्यात २ लाख ८५ हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या या काळातही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू गरीब आणि तरुणांवर आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे असं त्यांनी सांगितले.

३ कोटी गरीब लखपती झाले

गेल्या ७ वर्षात आपल्या सरकारने ३ कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. आता नळाचे पाणी जवळपास ९ कोटी ग्रामीण घरांपर्यंत पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत ५ कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी सुमारे ४ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे असंही पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले.

दरम्यान, जे गरीब होते ते झोपडपट्टीत राहत होते, आता त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. या घरांसाठीची रक्कमही पूर्वीच्या तुलनेत वाढली असून मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून घरांचा आकारही वाढला आहे. मोठी गोष्ट म्हणजे यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत, म्हणजेच आपण महिलांना घराची मालकिन बनवलं आहे असंही पंतप्रधान म्हणाले.  

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा