शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था स्थापन करणार, मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 4:39 PM

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हे व्यासपीठ सुरू होणार आहे, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात १५ ते १९ वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुण आहेत. या तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' (MyBharat) नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील तरुणांना त्यांची जबाबदारी समजते. पंचप्राणमधील कर्तव्याच्या भावनेबद्दलही भाष्य पंतप्रधान करत असतात, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्वात मोठी लोकसंख्या तरुणांची आहे. १५ ते १९ वयोगटातील ४० कोटी तरुण आहेत. ही भारताची मोठी ताकद आहे. 'मेरा युवा भारत' नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रात कोणाला योगदान द्यायचे असेल तर या व्यासपीठाचा मोठा आधार असेल. देशातील कोट्यवधी तरुणांनी यात सहभागी होऊन योगदान द्यावे, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. म्हणजेच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हे व्यासपीठ सुरू होणार आहे, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

स्वच्छ भारतने ७५ लाख किलो प्लास्टिक गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते, त्यानंतर आमच्या तरुणांनी १०० लाख किलो प्लास्टिकचे लक्ष्य गाठले. याअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची चर्चा आहे. भारताला विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी 'मेरा युवा भारत' प्रभावी ठरेल. युवा संवाद, युवा संसद, सांस्कृतिक कार्यक्रम, देवाणघेवाण कार्यक्रम अशा कामांसाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरेल, असे अनुराग ठाकुर म्हणाले.

तसेच, कोविडच्या काळातही तरुणांनी उत्स्फूर्तपणे योगदान आणि सहकार्य केले आहे. तरुणांमध्ये सेवा आणि कर्तव्याची भावना आणि स्वावलंबी भारत बनवण्याची ध्यास असेल तर ते येत्या २५ वर्षांत भारताला विकसित भारत बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात, असेही अनुराग ठाकुर यांनी सांगितले.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरNarendra Modiनरेंद्र मोदी