शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 9:46 AM

पत्रकार परिषदेदरम्यान मणिपूरवर विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकाराला सल्ला दिला.

Manipur Voilence : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी नवी दिल्लीत मणिपूरमधील परिस्थितीबाबत भाष्य केलं. मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार मेईतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांशी चर्चा करत आहे आणि घुसखोरी थांबवण्यासाठी म्यानमारशी संपर्क साधला असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संतापल्याचे पाहायला मिळाले. मणिपूरवर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अमित शाह यांनी पत्रकाराला तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका, असा सल्ला दिला.

तिसऱ्या मोदी सरकारचे १०० दिवस पूर् झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मणिपूरमधल्या परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगून तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर काहीही भाष्य न करणे पसंत केले. केंद्र सरकार राज्यात शांततेसाठी बोलत आहे, असं अमित शाह म्हणाले. तसेच वन नेशन वन इलेक्शन, वक्फ विधेयक आणि शेतकरी योजनांसह सरकारच्या अनेक कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. मात्र पत्रकाराने मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही.

पत्रकार परिषदेदरम्यान, एका पत्रकाराने अमित शहा यांना मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय गृहमंत्र्यांनी थेट उत्तर दिले नाही. उलट ते म्हणाले की तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण वाद घालू नका. यावेळी पत्रकाराने पंतप्रधान मोदी मणिपूरला कधी जाणार असेही विचारलं. त्यावर अमित शाह यांनी तुम्हाला माहिती दिली जाईल, असं म्हटलं.

"मणिपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोणतीही मोठी हिंसक घटना घडलेली नाही आणि लवकरच परिस्थिती सामान्य होईल अशी आशा आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचे मूळ हे जातीय संघर्ष असून तो सोडवण्याचा मार्ग दोन समुदायांमधील संवादातूनच आहे. हा जातीय हिंसाचार असून जोपर्यंत दोन समुदायांमध्ये संवाद होत नाही तोपर्यंत तोडगा निघू शकत नाही. सरकार शांतता राखण्यासाठी दोन्ही समुदायांशी सतत चर्चा करत आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे," असं अमित शाह यांनी म्हटलं.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सांगितले की, मणिपूरमधील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे म्यानमारमधून होणारी घुसखोरी, ती रोखण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या १०० दिवसांत म्यानमार आणि भारताच्या सीमेवर कुंपण घालण्याचे कामही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह