शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:53 IST

आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

नवी दिल्ली : माझ्या मुलाचा जीव व्यसन केल्यामुळे गेला, त्यामुळे कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे. मी माझा मुलगा फक्त यासाठी गमावला आहे कारण तो व्यसनाच्या विळख्यात अडकला होता, असेही त्यांनी म्हटले. खरं तर मंत्री कौशल कुमार यांनी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समर्थन केले. उमा भारती यांचा प्रयत्न समाजाला दिशा देणारा असून लोकांचा जीव वाचवणारा आहे असे मंत्री किशोर यांनी म्हटले.

"आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांना देशातून पळवून लावले, पण जाताना त्यांनी देशात व्यसनाचे जाळे सोडले. वेगवेगळ्या व्यसनाच्या सेवनामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळेच निरोगी राहायचे असेल तर व्यसनाला नाही म्हणा. त्यामुळे मी आवाहन करतो की, त्यापासून दूर राहा", अशा शब्दांत सौरभ कुमार यांनी तरूणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. खरं तर अलीकडेच केंद्रीय मंत्री जबलपूरला गेले होते. यावेळी त्यांनी अमली पदार्थांबाबत अनेक गोष्टींवर भाष्य केले. 

"मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही"केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनीही याबाबत ट्विट केले आहे की, "मी स्वत: खासदार झालो आणि माझी पत्नी आमदार झाल्यानंतरही मी माझ्या मुलाचे आयुष्य व्यसनापासून वाचवू शकलो नाही, पण आता कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे. व्यसनामुळे कोणतीही महिला विधवा होऊ नये, व्यसनामुळे कोणतेच मूल पितृहीन होऊ नये."

केंद्रीय मंत्र्याची खदखद आपल्या मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन कधी लागले हे कळलेही नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यामुळे त्याची प्रकृती ढासळू लागली. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता त्याचे यकृत खराब झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आणि 2020 मध्ये त्याचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री यांनी म्हटले की, त्याच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित करत असताना, त्यांनी संकल्प केला की मी आता अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल आणि लोकांना त्यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेल. तेव्हापासून ते सातत्याने लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करत आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :ministerमंत्रीDrugsअमली पदार्थMember of parliamentखासदारBJPभाजपाalcohol prohibition actदारुबंदी कायदा