शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

#MeToo: लवकरच कायदेतज्ज्ञांच्या समितीची स्थापना; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 16:35 IST

महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधींची माहिती

नवी दिल्ली: मीटू चळवळीतून पुढे आलेल्या घटनांच्या तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल. #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मीटू चळवळीनं जोर धरला आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि पत्रकारांचा समावेश आहे. या तक्रारींची प्रथमच सरकारनं दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकार चार सदस्यांची नेमणूक करणार आहे. यामध्ये चार निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असेल. या समितीकडून मीटू चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या तक्रारींवर सुनावणी होईल.मी टूच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रत्येक महिलेचं दु:ख आणि त्यांची व्यथा मी समजू शकते, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. 'या तक्रारींच्या चौकशीसाठी चार निवृत्त न्यायाधीशांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही समिती स्थापन होईल आणि या सर्व तक्रारींवर सुनावणी होईल', अशी माहिती त्यांनी दिली. अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात गैरवर्तनाची तक्रार केल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले अनुभव मोकळेपणानं सोशल मीडियावर मांडले. यासोबतच अनेक महिला पत्रकारांनीदेखील त्यांना आलेले कटू अनुभव या माध्यमातून जगासमोर आणले आहेत.

टॅग्स :Metoo CampaignमीटूManeka Gandhiमनेका गांधी