शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद म्हणजे जुन्या क्लबसारखी"; परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:49 IST

एस जयशंकर यांनी थेट UNSC च्या उणिवांवरच बोट ठेवले

S Jaishankar on United Nations Security Council : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. प्रत्येक मुद्द्यावर ते अतिशय खुलेपणाने आणि रोखठोकपणे आपले मत मांडतात. त्यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) काही उणीवांवर बोट ठेवले आहे. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेची तुलना एखाद्या जुन्या क्लबशी केली आहे. या परिषदेतील काही सदस्यांना आपली पकड सैल पडू द्यायची नाही असा प्रकार दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर यांच्या मते, यामुळे जगाचे नुकसान होत आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी प्रयत्न करत आहे. त्यात स्थायी सदस्यत्वासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व आहे. बदलत्या जगासोबत हे वर्चस्व मोडीत काढावे, अशी भारताची इच्छा आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी म्हणाले की, सुरक्षा परिषद जुन्या क्लबसारखी आहे. त्यात काही असे सेट सदस्य आहेत जे त्यावरील पकड सैल पडू देण्यास इच्छित नाहीत. त्यांना क्लबचा ताबा घ्यायचा आहे. अधिक सदस्य स्वीकारण्यास ते फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे त्यांना वाटत नाही. एक प्रकारे हे मानवी अपयशच आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की आज ते जगाचे नुकसान करत आहे असे कळणे गरजेचे आहे. जगासमोरील प्रमुख समस्यांवर संयुक्त राष्ट्र संघ कमी प्रभावी दिसू लागला आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला जागतिक भावनाही सांगू शकतो. म्हणजेच, आज तुम्ही जगातील २०० देशांना विचाराल की त्यांना सुधारणा हव्या आहेत की नाही तर खूप मोठ्या संख्येने देश म्हणतील की होय, आम्हाला सुधारणा हव्या आहेत. असे असताना बदल करणे अपेक्षितच आहे.

दरम्यान, जयशंकर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाकडून पेट्रोल खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले असतानाही जयशंकर यांनी युरोपला आरसा दाखवला होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAmericaअमेरिकाIndiaभारत