शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'Republic TV'चं IBF चं सदस्यत्व रद्द करा; एनबीएची मागणी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 19, 2021 12:27 IST

काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी, पार्थो दास यांच्यातील संभाषण झालं होतं व्हायरल

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी, पार्थो दास यांच्यातील संभाषण झालं होतं व्हायरलरिपल्बिक टीव्हीचं आयबीएफ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

आऊटलायर मीडियाचे (रिपब्लिक टीव्ही) व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी आणि BARC इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यान व्हॉट्सअॅपवर झालेलं संभाषण व्हायरल झालं होतं. यानंतर या प्रकरणी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं आपली प्रतिक्रिया देत देत रिपब्लिक टिव्हीची आयबीएफ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच अनेक महिन्यांपर्यंत बनावट पद्धतीनं रिपब्लिक टिव्ही पाहणारे अधिक लोकं असल्याचे दाखवण्यासाठी दोघांमध्ये संगनमत झाल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. एनबीएनं रिपब्लिक टिव्हीची इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचं सदस्यत्व तात्काळ पद्धतीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. "व्हॉट्सअॅपवरील संदेशांवरून गेल्या काही महिन्यांपासून बनावट पद्धतीनं रिपब्लिक टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या अधिक दाखवण्यात आली आणि अन्य वाहिन्यांचं रेटिंग कमी करण्यात आला. याचाच अर्थ यामुळे रिपब्लिक टीव्हीला फायदा पोहोचवण्यात आला," असं एनबीएनं म्हटलं आहे. "हे व्हॉट्सअॅपवरील मेसेज ना केवळ रेटिंगमधील हेराफेरी दर्शवतात तर यावरून सत्तेचा खेळही दिसून येतो. संदेशांच्या देवाणघेवाणीमध्ये सरकारमध्ये सचिवांची नियुक्ती, मंत्रिमंडळात बदल, पीएमओपर्यंत पोहोच, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत कामकाजावर प्रकाश पडत आहे. यावरून एनबीएद्वारे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या आरोपांना दुजोरा मिळत आहे," असंही एनबीएनं म्हटलं आहे. BARC रेटिंग सिस्टमपासून बाहेर ठेवा"रिपब्लिक टीव्हीचं प्रकरण जोवर न्यायालयात प्रलंबित आहे तोवर त्यांचं आयबीएफचं सदस्यत्व तात्काळ प्रभावानं रद्द करण्यात यावं. रिपब्लिक टीव्हीद्वारे रेटिंगमध्ये हेराफेरी केल्यामुळे या उद्योगाला मोठं नुकसान झालं आहे आणि यामुळेच न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोवर या क्षेत्राला BARC रेटिंग सिस्टमपासून बाहेर ठेवावं," अशी मागणीही आयबीएफनं केली आहे. सध्या या रेटिंगवर विश्वास ठेवता येणार नाही. तसंच संवादावरून हा कारभार मनमानी पद्धतीनं सुरू असल्याचं दिसत आहे. यावरून या व्यवस्थेवर कोणाचाही अंकुश नसल्याचं दिसून येत आहे आणि बार्कमधील काही लोकं आपल्या मर्जीनुसार रेटिंगमध्ये बदल करत आहे. ही सिस्टम पारदर्शक प्रणाली ऐवजी मॅनेजमेंटच्या मनमर्जीनं सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. 

रिपोर्ट दाबला"वास्तवात पाहिलं तर कोणतंही कठोर पाऊल उचलण्याऐवजी बार्कनं जुलै २०२० पासून अनेक महिने अहवाल दाबून ठेवला. यावरून हेराफारीवर प्रकाश पडू शकतो. गोपनीयतेबाबत सांगून बार्क न केवळ एनबीएला आकडेवारी दाखवण्यापासून वाचत आलं आहे. तसंच त्यांनी ब्रॉडकास्टर्स विरोझात कारवाई केली नाही, ना कोणता दंड ठोठावला, ना कारवाई सुरू करण्याक आली," असंही एनबीएनं म्हटलं आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्हीTRP Scamटीआरपी घोटाळाTelevisionटेलिव्हिजन