शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

UP Assembly Election 2022: निवडणूक आयोगाचे अधिकारी करताहेत ईव्हीएमशी छेडछाड, मतमोजणीपूर्वी अखिलेश यादवांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 22:38 IST

UP Assembly Election 2022: एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.

लखनौ - चुरशीच्या झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान काल आटोपले. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार येईल, असा कल वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपा जिंकेल असा मतप्रवाह एक्झिट पोल निर्माण करत आहेत. ही लोकशाहीची शेवटची लढाई आहे. उमेदवारांना न सांगता ईव्हीएम पोहोचवल्या जात आहेत. जर ईव्हीएम अशा प्रकारे नेण्यात येत असतील तर आपल्याल सतर्क राहिले पाहिजे. ही चोरी आहे. आपली मते वाचवण्याची गरज आहे. आम्ही याविरोधात न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्यापूर्वी मी लोकांना लोकशाही वाचवण्याचे आवाहन करतो.

अखिलेश यादव यांनी पुढे सांगितले की, समाजवादी पक्ष अयोध्येत विजय मिळवणार आहे, त्यामुळेच भाजपा घाबरली आहे. आता निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमशी छेडछाड करत आहेत. सोनभद्रमध्ये सपाच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जात असलेल्या सरकारी गाड्या पकडल्या आहेत. त्यामध्ये शिक्का आणि मतपेट्या मिळाल्या आहेत.

अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे की, जर तुम्ही मत दिले असेल तर ते मत वाचवा. आता आणखी तीन दिवस ईव्हीएम वाचवाव्या लागतील. जसे शेतकरी बसले तसेच कार्यकर्त्यांनाही बसावे लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना पुढे यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२