शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

UP Assembly Election: 'देश शरियतने नाही तर संविधानाने चालेल', योगींचे विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 11:57 IST

UP Election: "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. वैयक्तिक श्रद्धा, मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही.''

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, हा नवीन भारत शरिया कायद्यानुसार नाही तर राज्यघटनेनुसार काम करेल, असे ते म्हणाले. राज्यात सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात आज नऊ जिल्ह्यांतील एकूण 55 जागांसाठी मतदान होत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'गझवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्या 'तालिबानी विचारसरणी'च्या धार्मिक कट्टरतावाद्यांनी लक्षात ठेवावं...ते राहतील किंवा न राहतील, भारत शरियतनुसार नाही, तर संविधानालानुसार चालेल. जय श्री राम!'

हा नवा भारत आहेयोगी आदित्यनाथ यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला आहे की त्यांची "80 विरुद्ध 20" ही टिप्पणी "विकासाचे समर्थन करणारे आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करणारे यांच्यातला फरत दाखवणारी आहे. ते पुढे म्हणाले की, "मी पूर्ण स्पष्टपणे सांगू शकतो की, हा नवा भारत आहे. हा जगातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत आहे. या नव्या भारतात विकास सर्वांचा असेल."

हिजाब वादावर प्रतिक्रियायावेळी त्यांनी कर्नाटकातील हिजाब वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक श्रद्धा, आमचे मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही मी उत्तर प्रदेशातील लोकांना आणि कार्यकर्त्यांना भगवा घालायला सांगतोय का? त्यांना काय घालायचे आहे, ही त्यांची निवड आहे. पण शाळांमध्ये ड्रेस कोड असायला हवा, हा शिस्तीचा भाग आहे'', असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथ