शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 08:58 IST

उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. तापमान दररोज रेकॉर्ड मोडत आहे. उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. पण काम करण्यासाठी मोठ्या लोकांना या कडक उन्हात घराबाहेर पडावं लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीला देखील याचा फटका बसला आहे. 

जून सुरू झाल्यानंतर उत्तर भारतात सकाळपासूनच सूर्य सतत तळपत असतो. पूर्वी हे फक्त रेकॉर्ड तोडण्यापुरतच होतं. पण आता सतत होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेने ३३ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. यामध्ये शनिवारी कानपूर आणि बुंदेलखंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये ४६.३, हमीरपूर ४६.२, झाशी ४६.१, वाराणसी ४६, प्रयागराज ४६ आणि आग्रा येथे ४५.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

१२८ वर्षांत बिहारला आता सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पाटण्यात उष्णतेच्या लाटेचा कहर इतका आहे की, लोकांना घरांमध्येच राहावं लागत आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच रस्त्यांवर अघोषित संचारबंदी आहे. देशाची राजधानी दिल्लीला डबल फटका बसला आहे. एकीकडे उष्णतेचा त्रास तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई. दिल्लीची परिस्थिती अशी आहे की, या कडक उन्हात लोकांना पाण्याच्या शोधात अनेक किलोमीटर दूर जावे लागते आणि तरीही पाणी मिळत नाही.

दिल्लीतील हवामान विभागाने पुढील तीन दिवस दिल्लीत भीषण गरमी आणि उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणजे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही. मान्सूनच दिल्लीला या उष्णतेपासून वाचवू शकतो. मात्र ३० जूनपूर्वी त्यांचं आगमन होण्याची शक्यता दिसत नाही.

मान्सून कधी येणार?

आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दिल्लीत येण्याची वेळ ३० जूनच्या आसपास आहे. मान्सून थेट दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत नाही. आम्हाला आशा आहे की येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, बंगाल, बिहार, झारखंडच्या काही भागात मान्सूनची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे थोडे दिवस उष्णतेची लाट अशीच सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी हाच उत्तम उपाय आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTemperatureतापमानdelhiदिल्ली