शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

UP Election 2022: यूपी मा हवा कुछ बदला बदला सा है..! वाराणसीतील मतदारांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 6:12 AM

UP Election 2022: योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन... वाराणसीतील मतदार सांगत होते.

धनाजी कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क

वाराणसी : योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन सांड और गाय के बारे में जो वादा किया था वो पुरा नहीं किया. उसी वजह से हमरा यूपी का हवा अब कुछ और ही है..! असं वाराणसीत भेटलेले मतदार सांगत होते.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा माहोल अंतिम टप्प्यात आला, तशी रंगतदेखील वाढली आहे. कोण बाजी मारणार हे आता १० तारखेला कळेल. येथील मतदारांसोबत बोलताना शेवटचा टप्पा किती महत्त्वाचा मानला जातो, याचा अंदाज आला.

पन्नाशीत असलेले जौनपूरचे जंगबहादूर यादव राजकारणाबरोबर सामाजिक परिस्थितीबद्दल बोलत होते. योगी सरकारने नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा पायंडा पाडला. अखिलेश यादव सत्तेत होते, तेव्हा त्यांनी मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यावर भर दिला होता. 

जनतेला आता सार्वजनिक विकासापेक्षा व्यक्तिगत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असल्याने ते तत्काळ मिळणाऱ्या फायद्याचा विचार करतात. मात्र, आता यूपीची हवा बदलली आहे, असे त्यांना वाटते. उत्तर प्रदेशात मोकाट जनावरांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 

मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होते. अपघात होतात. लोक मारले जातात; पण सरकारने ठोस काही केले नाही. त्याचा प्रचंड राग जनतेच्या मनात आहे.

गाजीपूरचा मोहम्मद अरशद हा तरुण म्हणाला, मी परदेशात असतो. राज्यातच काम मिळाले तर आम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. राजकारणी आश्वासने देतात, ती पाळली जात नाहीत. आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, विवेक जागा ठेवून त्याचा उपयोग केला पाहिजे.

मिर्जापूरचे इम्तियाजअली अन्सारी मुंबईत खारघरमध्ये छोटा व्यवसाय करतात. भाजप-सपमध्येच मुख्य लढत असली तरी इतर पक्षांची काही प्रमाणात ताकद आहेच. त्यामुळे एका पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही, आघाडी करूनच सरकार स्थापन करावे लागणार आहे. जातिधर्माच्या नावावर मते फिरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

रोजगाराची केवळ घोषणाच राहू नये

कौशिक घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे. व्यवसायामुळे वाराणसीत असतात. ते म्हणाले, भाजपला जागा जास्त मिळणार नाहीत; पण सरकार त्यांचेच येईल. राकेश कुमार हा तरुण म्हणाला, तरुण वर्गाची मतेही निर्णायक ठरतील.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण