शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

UP Election Result: योगींपुढे चंद्रशेखर आझादचा दारुण पराभव, जाणून घ्या किती मिळाली मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:47 IST

युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा मोठ्या विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे. प्राथमिक कल पाहता भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा आता एका झटक्यात राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. कारण, युपीत भाजपला मोठं यश मिळालं असून गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ हेही विजयी झाल्याचं दिसून येतं. या मतदारसंघात दुपारी 2.25 मिनिटांच्या वेळेपर्यंत योगी आदित्यनाथ यांना 60,310 मतं मिळाल आहेत.  

युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. भाजपाचे कार्यकर्ते पुष्पवृष्टीच्या माध्यमातून आपला आनंद साजरा करत आहेत. गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज निकालाच्या दिवशी सकाळपासूनच ते निकालात बाजी मारताना दिसून येत आहेत. निवडणूक आयोगने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार दुपारी 2.25 मिनिटांच्या वेळेपर्यंत योगी आदित्यनाथ यांना 60,310 मतं मिळाल आहेत. 

योगी आदित्यनाथ यांना या मतदारसंघातून म्हणावं अशी कुणीही टस्सल दिली नाही. कारण, योगीनंतर समाजवादी पक्षाच्या शुभावती उपेंद्र दत्त शुक्ला यांना 2.25 वाजेपर्यंत 20,166 मतं मिळाली आहेत. तर आझाद समाजवादी पक्षाचे नेते आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांना केवळ 3,153 मतं मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवार डॉ. चेतना पांडे यांना केवळ 1092 मतं मिळाली आहेत. तर, बहुजन समाज पक्षाच्या ख्वाजा शमसुद्दीन यांना 3648 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांचा एकतर्फी विजय झाल्याचे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. 

चंद्रशेखर यांची क्रेझ, पण मतदान नाहीच

डोक्यावर निळी पगडी, गळ्यात निळे वस्त्र, चेहऱ्यावर रेबॅनचा गॉगल, भाषणांमध्ये आग... हा आहे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढणारे चंद्रशेखर आझाद यांचा संक्षिप्त परिचय. त्यांची स्टाईल व स्वॅगचे दलित युवक चाहते आहेत, त्यांनी सोशल मीडियातही क्रेझ दिसते. मात्र, चाहत्यांचं हे प्रेम मतदानाच्या पेटीतून व्यक्त झालंच नाही. महाराष्ट्रात १९७२मध्ये दलित पँथरने जशी चेतना जागविली होती, तशीच चेतना ते उत्तर प्रदेशच्या दलितांमध्ये जागवू इच्छित आहेत. त्यावेळी महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रभाव कमी झालेला होता. चंद्रशेखर यांचा उदयही उत्तर प्रदेशात अशाच स्थितीत झालेला आहे.

२०१५ मध्ये भीम आर्मीची स्थापना

उत्तराखंडच्या सीमेवरील छुटमलपूर येथील गोवर्धन दास यांचे पुत्र चंद्रशेखर हे बालपणापासूनच बंडखोर स्वभावाचे. त्यांनी आपल्या गावाबाहेर स्वागताबद्दल एक बोर्ड लावला होता. तो उच्चवर्णीयांना आवडला नव्हता. परंतु त्यांनी पर्वा केली नाही. २०१५ मध्ये त्यांनी भीम आर्मीची स्थापना केली. ते म्हणतात - देशाची आर्मी जशी नागरिकांचे रक्षण करते, तसे भीम आर्मी दलितांच्या हिताचे रक्षण करते. सहारणपूरमध्ये दलितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी ४०० भीम आर्मी स्कूलची स्थापना केली. यात मुले-मुली एकत्रित शिकतात. ठाकुरांच्या दादागिरीच्या विरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली व जेलमध्येही गेले. त्यामुळेच त्यांनी आपल्या नावात रावण शब्दाला स्थान दिले. राजकारणात आल्यानंतर त्यांनी हे उपनाम हटविले. दुचाकीवरून गावोगावी फिरून ते दलितांमध्ये त्यांच्या अधिकारांची जागृती करतात.

एक पाय जेलमध्ये...

मागील पाच वर्षांत दलितांच्या हितांसाठी आंदोलने केल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांचा एक पाय जेलमध्ये राहिलेला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची अटक राजकीय असल्याची टिप्पणी करून सुटका करण्याचा आदेश दिला तर योगी सरकारने त्यांना एनएसएनुसार पुन्हा अटक केली होती. 

पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानंतर गोल टोपी घालून व शेरवानी परिधान करून ज्या पद्धतीने ते दिल्लीच्या जागा मशिदीत भाषण देण्यासाठी गेले, त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

करा किंवा मरा...

आजवर त्यांचे कार्यक्षेत्र सहारणपूर व परिसरातील काही जिल्हे होते. मार्च २०२०मध्ये त्यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. परंतु आजवर एकही निवडणूक लढविली नाही. ते प्रथमच संपूर्ण राज्यात निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहेत. उत्तर प्रदेशचा जिग्नेश मेवानी त्यांना व्हायचे आहे. ३५ वर्षीय चंद्रशेखर यांच्यासाठी करा किंवा मरा, असा हा क्षण आहे. यशस्वी झाले तर हीरो अन्यथा झीरो बनणे निश्चित आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBhim Armyभीम आर्मीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझाद