शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 4:30 PM

पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर पाहायला आहे. गेल्या ४८ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये अपघात होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशातील ५८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तर सुलतानपूरच्या लांबुओ येथे सर्वाधिक २७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी वीज पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच सीतापूरमधील ३०० हून अधिक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गवाहिया गावात घराची भिंत कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

पावसाने केला कहर 

अयोध्येतील परिस्थितीही अत्यंत वाईट होती, या हंगामातील सर्वाधिक १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथे घराचे छत कोसळले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ललितपूर आणि फतेहपूरमध्येही वीज पडून एक मुलगी आणि एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. आंबेडकरनगरमध्ये वीज पडल्याने चार बहिणींचा मृत्यू झाला.

शाळेचा परिसर जलमय

उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आंबेडकरनगर येथील कस्तुरबा गांधी शाळेचा परिसर जलमय झाला होता. अनेक शासकीय कार्यालये आणि रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

आजही हवामान खात्याने राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात नागरिकांना घरातमध्येच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस