शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यूपीए सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केले, पण त्यांचा मतासांठी वापर केला नाही- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 12:08 IST

माजी पंतप्रधानांचा मोदींवर स्ट्राइक

नवी दिल्ली: यूपीए सरकारच्या काळात अनेक सर्जिकल स्ट्राइक झाले. पण आम्ही कधीही त्यांचा मतांसाठी वापर केला नाही, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारसभांमध्ये एअर स्ट्राइक आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत असताना सिंग यांनी हे विधान केलं. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद्यांविरोधातील कारवाई, आर्थिक आघाडीवरील देशाची स्थिती या मुद्द्यांवर सिंग यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आम्ही कूटनीतीच्या माध्यमातून पाकिस्तानला उघडं पाडण्याचा मार्ग स्वीकारला. पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले. लष्करी सामर्थ्याचा वापर न करता कूटनीतीच्या मार्गानं जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं. 26/11 च्या हल्ल्यानंतर 14 दिवसांत आम्ही हाफिझ सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यशस्वी झालो. त्यासाठी आम्ही चीनशी संवाद साधला होता. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या सईदवर अमेरिकेनं 10 मिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर केलं. त्यासाठी यूपीए सरकारनंच प्रयत्न केले होते, असं सिंग म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी सध्या झंझावाती दौरे करत आहेत. प्रत्येक जनसभेत मोदी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. यावरही सिंग यांनी भाष्य केलं. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या माध्यमातून मोदींनीच सागरी सीमा सुरक्षा यंत्रणेला विरोध केला होता. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, असं सिंग यांनी सांगितलं. सिंग यांनी 1971 आणि 1965 मध्ये झालेल्या युद्धांचा संदर्भ देत मोदींवर निशाणा साधला. इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र त्यांनी कधीही लष्कराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, अशा शब्दांमध्ये सिंग यांनी मोदींवर शरसंधान साधलं. 

इंदिरा गांधी आणि शास्त्रींची सध्याच्या पंतप्रधानांशी तुलनाच होऊ शकत नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. मोदी आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जवानांच्या कामगिरीमागे आपलं आर्थिक अपयश लपवण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचं सरकार आल्यास पुन्हा पंतप्रधान व्हायला आवडेल का, या प्रश्नालादेखील त्यांनी उत्तर दिलं. आता नेतृत्व तरुणांकडे सोपवण्याची वेळ आल्याचं सिंग म्हणाले.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईदAmericaअमेरिकाIndira Gandhiइंदिरा गांधीLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्री