शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

UPSC Success Story: रेल्वे अपघातात हात-पाय गमावले, तरीही हार मानली नाही; पहिल्याच प्रयत्नात झाला IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 3:33 PM

UPSC च्या मुलाखतीत दिले असे उत्तर, पॅनलमधील सर्वांनीच केले जोरदार कौतुक.

नवी दिल्ली: 'कोशिश करने वालों की हार नहीं होती...' हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी यूपीएससी(UPSC) परीक्षेत तंतोतंत खऱ्या ठरतात. काही दिवसांपूर्वीच UPSC 2022 चा निकाल लागला आणि या निकालात मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सुरज तिवारीने या ओळी खऱ्या ठरवल्या आहेत.

रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावलेल्या सूरजने यूपीएससी परीक्षेत 917 वा क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर सर्वच स्तरातून सुरजचे कौतुक होत आहे. सुरजचे यश सर्वांना दिसले, पण त्यामागची त्याची मेहनत फार थोड्या लोकांना माहिती आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी खरंच इतरांना प्रेरणा देऊन जाते.

दरम्यान, सुरज तिवारीने त्याच्या युपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत घडलेला एक किस्सा सांगितला. यावेळी अधिकाऱ्याने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुरजने सर्वांनाच चकीत केले. अधिकाऱ्याने प्रश्न विचारला की, तुम्ही स्पेशल कॅटेगरीतून येता. तुमची निवड झाल्यावर, तुमच्या कॅटेगरीतील लोकांसाठी कोणत्या योजना राबवाल?

या प्रश्नाला उत्तर देताना सुरज म्हणाला की, माफ करा सर, मी कोणत्याही स्पेशल कॅटेगरीतून आलेलो नाही. मी तुमच्याप्रमाणे सर्व काही करण्यास सक्षम आहे. यावेळी सुरजचे उत्तर ऐकून पॅनेलमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले.

रेल्वे अपघातात पाय गमावले24 जानेवारी 2017 रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती. यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर 2018 मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बीएमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून 2021 साली बीए पास करून एमएला प्रवेश घेतला. लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. अखेर त्याला यश मिळाले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी