शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

NDTVवरील बंदी तत्काळ उठवा - एडीटर्स गिल्डची मागणी

By admin | Published: November 04, 2016 1:12 PM

हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा ' एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'ने निषेध नोंदवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ -  भारतातील आघाडीचे हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा ' एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'ने निषेध नोंदवला आहे. 
पठाणकोट हल्ला झाला त्यावेळी नियम मोडून कव्हरेज केल्याचा आरोप ठेवत केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने एनडीटीव्ही इंडियावर ही कारवाई केली असून ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ पासून २४ तासांसाठी चॅनेलचे प्रसारण बंद ठेवण्यात येणार आहे. पठाणकोट हल्ल्यावेळी  एनडीटीव्ही इंडियाने केलेलं कव्हरेज हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक होतं. त्यांनी दाखवलेल्या माहितीचा दहशतवादी वापर करू शकत होते, अशाप्रकारची माहिती जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे, असा आरोपही चॅनेलवर ठेवण्यात आला.
मात्र याप्रकरणी मीडियात नाराजी व्यक्त होत असून एनडीटीव्हीवरील ही बंदी ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी मागणी 'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'च्या सदस्यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी एक निवेदनही जारी केले आहे. 
 
(पठाणकोट हल्ला: सरकारकडून NDTV वर एका दिवसाची बंदी)
(पठाणकोटमध्ये नेमके घडले तरी काय ?)
(हाफीझ सईदची पुन्हा धमकी, पठाणकोट हल्लेखोरांचे कौतुक)
(पठाणकोट दहशतवादी हल्यातील संशयितांना पाकिस्तानमध्ये ६ दिवसांची पोलीस कोठडी)
 
' केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने एनडीटीव्ही इंडिया एका दिवसासाठी ऑफ एअर करण्याच्या दिलेल्या निर्णयाचा 'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया' कडक शब्दांत निषेध करत आहे. सरकारने जारी करण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीला एनडीटीव्हीने उत्तर दिले असून  आम्ही (पठाणकोट हल्ल्याचे) केलेले कव्हरेज संतुलित होते व इतर मीडियाने कव्हर केलेल्या गोष्टींपेक्षा अधिक वा गुप्त राखलेली कोणतीही अधिक माहिती आम्ही शेअर केली नाही' असे या निवदेनात नमूद करण्यात आले आहे. 
' (एनडीटीव्ही) चॅनेल एका दिवसासाठी ऑफ एअर करण्याचा ( हा) निर्णय (म्हणजे) प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे आणि भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन असून सरकारच्या या सेन्सॉरशिपमुळे आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देते.  ज्या माध्यमांच्या कव्हरेजशी सरकार समहत नसेल अशांना शिक्षा करण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारने केलेला सत्तेचा दुरूपयोग असून ते प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. प्रसारमाध्यमे जर बेपर्वाईने वागत असतील तर त्यांच्याविरोधात कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचा अधिकार नागरिकांना व सरकारला आहे. मात्र तसे न करता चॅनेलवर बंदी लादणे म्हणजे स्वातंत्र्य व न्यायाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणे होय.  त्यामुळे चॅनेलवर एका दिवसाची बंदी लादण्याचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया करत आहे.' 
 राज चेंगप्पा, अध्यक्ष
 प्रकाश दुबे, महासचिव
 सीमा मुस्तफा, कोषाध्यक्ष