शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

Pargal Terrorist Attack: उरीसारखा प्रयत्न! अंधारात परगल आर्मी कॅम्प कुंपणाच्या तारा कापल्या, दोन दहशतवादी ठार, तीन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 7:56 AM

Pargal terrorist Attack: जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये १९ जवान शहीद झाले होते. तसाच प्रयत्न आज रात्री हाणून पाडण्यात आला.

अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना दोन दिवसांत दोन मोठे दहशतवादी कट उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पुलवामामध्ये मोठ्या प्रमाणावर आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. असे असताना उरी हल्ल्यासारखा भारतीय जवानांच्या कॅम्पवर हल्ला करण्याचा प्रयत्न लष्कराने उधळून लावला आहे. 

रात्रीच्या अंधारात काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील परगल आर्मी कॅम्पच्या कुंपणाच्या तारा कापल्या होत्या. यातून ते कॅम्पमध्ये प्रवेश करणार होते. तेवढ्यात डोळ्यात तेल घालून गस्त घालणाऱ्या जवानांच्या हा प्रकार लक्षात आला आणि पलिकडून गोळीबार सुरु झाला. याला प्रत्यूत्तर देताना दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर तीन जवान शहीद झाले आहेत.

 

11 राष्ट्रीय रायफल बटालियनकडून मिळालेल्या माहितीनुसार राजौरीच्या परगल तळामध्ये काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही बाजुंनी फायरिंग झाली. सहा किमीच्या परिसराला लष्कराने वेढले असून सर्च ऑपरेशन जारी आहे. धरहल पोलीस स्टेशनपासून सहा किमीच्या परिसरात लष्कराच्या दुसऱ्या तुकड्या देखील तैनात केल्या गेल्या आहेत. दहशतवाद्यांनी उरीसारखा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. 

2016 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये १९ जवान शहीद झाले. त्याचवेळी 19-30 सैनिक जखमी झाले. चारही दहशतवादी मारले गेले. प्रत्युत्तर म्हणून, भारताने पीओकेमध्ये प्रवेश केला आणि सर्जिकल स्ट्राइक केले आणि दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी