शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जातीय विद्वेषासाठी सोशल मीडियाचा वापर चिंताजनक; सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 06:43 IST

देशाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत

नवी दिल्ली : सोशल मीडियावरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांचा जातीय विद्वेषासाठी होणारा वापर हा चिंताजनक आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. जातीय विद्वेष पसरविणाऱ्या अफवांविरोधात काही जणांनी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर गुरुवारी झाली.

मरकझ निझामुद्दीन येथे तबलिघी जमात या संघटनेचा मेळावा भरला होता. त्यामुळे देशात कोरोनाचा मोठा फैलाव झाला, अशा अफवा सोशल मीडियावरून पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आणून देणारी याचिका जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने दाखल केली आहे. त्यावरही सुनावणी झाली. अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, वेब पोर्टलवर कुणाचेही नियंत्रण नसते. तिथे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना जातीय रंग देण्याचेही प्रयत्न होतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते, याकडेही सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अफवा रोखण्यासंदर्भात सोशल मीडियाने अधिक जबाबदारीने पावले उचलायला हवी होती; पण तसे झाल्याचे दिसत नाही.

वाईट गोष्टींना रोखण्यासाठी नवे आयटी नियम

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठीच नवे माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियम सरकारने बनविले. त्यांना आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात याव्यात, अशी विनंती करणारी याचिकाही केंद्र सरकारने केली आहे. तिचीही अन्य याचिकांबरोबरच सुनावणी झाली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय