शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
3
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
4
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
5
काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
6
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
7
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
8
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
9
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
10
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी
11
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
12
Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण
13
नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 
14
'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो
15
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
16
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
17
शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन 
18
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
19
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
20
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

उत्कृष्टतेचा आदर आणि सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 3:02 AM

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने

- अमिताभ श्रीवास्तवभारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात लोकसभा आणि राज्यसभेत आपली कामगिरी व आचरणाने संसदीय लोकशाहीला विशेष प्रतिष्ठा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया सदस्यांचा सन्मान केला. या संसद सदस्यांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी मार्गदर्शक आहे. आधी विधिमंडळ गौरव पुरस्कार आणि नंतर लोकमत संसदीय पुरस्कार देण्यामागे लोकमत समूहाची एक रचनात्मक भावना आहे. संसदेत नुसता गोंधळ घालण्यापेक्षा जनतेच्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप कसे देता येईल, पूर्ण माहितीसह अभ्यासपूर्ण भाषणे कशी केली जातील, विचारांचे आदान-प्रदान कसे होईल, यावर विचार करणे खूपच गरजेचे आहे. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कायदे बनविले आहेत. परंतु अलिकडील काळात संसद असो वा देशभरातील विधिमंडळ, यामध्ये गंभीर चर्चा, तार्किक वादविवादापेक्षा सभागृह ठप्प पाडणे, चर्चा न होऊ देणे, गोंधळाचा फायदा घेऊन विधेयके पारित करून घेण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. समाजसुधारक आणि विचारवंतांना जशी या गोष्टींची चिंता आहे आणि देशातील कोट्यवधी नागरिकांनाही त्यांचा अपेक्षाभंग होण्याचे दु:ख आहे. कारण सुखी आयुष्य, अन्न-वस्त्र-निवारा या सारख्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी जनतेच्या सर्व अपेक्षा या सभागृहाशी जुळलेल्या आहेत. अशा स्थितीत देशातील तरुणाईच्या मनात असलेला सभागृहाचा आदर एका क्षणालाही कमी होऊ नये, हेच लोकमत समूहाचे प्रयत्न राहिले आहेत.निरंतर निर्भीड, निष्पक्ष आणि लोकोपयोगी पत्रकारिता करणारा ‘लोकमत’ दलित, पीडित, शोषित, उपेक्षितांच्या हक्कांसाठी नेहमी लढत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध आणि स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी लढण्याचे व्रत ‘लोकमत’ने परिश्रमपूर्वक जपले आहे. याच क्रमात पुढे संसदेत जनतेच्याआशा-आकांक्षा पूर्ण करणाºया आदर्श लोकप्रतिनिधींचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ची योजना करण्यात आली. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी मुख्य अतिथीच्या रूपात तर विविध पक्षांचे वरिष्ठ नेत्यांसोबतच विविध देशांचे राजदूत आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.