शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

“५०० वर्षांनी रामजन्मभूमी परत मिळू शकते, तर पाकमधून सिंधू का नाही?”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 8:03 PM

CM Yogi Adityanath: १९४७ मध्ये फाळणी थांबवता आली असती. परंतु, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे भारताचा मोठा भाग वेगळा झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

CM Yogi Adityanath: ५०० वर्षांनी श्री रामजन्मभूमी परत मिळू शकते, तर पाकिस्तानमध्ये असलेला सिंधू का परत मिळू नये, असे मोठे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. सिंधी समाज संमेलनाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.

सिंधी समाज हा भारताच्या सनातन धर्माचा एक भाग आहे. १९४७ मध्ये झालेली देशाची फाळणी थांबवता आली असती. परंतु, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे भारताचा मोठा भाग पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. आजही फाळणीचे परिणाम दहशतवादाच्या रूपाने दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सीमेपलीकडील दहशतवाद भारतात शेवटच्या घटका मोजत आहे. जर श्री रामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येत असेल तर आपण पाकिस्तानमधून सिंधू परत घेऊ शकत नाही असे काही कारण नाही, असे विधान करत हे आताच्या पिढीला सांगा. तुमच्या पूर्वजांबद्दल सांगा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.

प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे

पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, नक्कीच यश मिळेल. प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे.पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने काशी विश्वनाथ परिसराचा कायापालट झाला आहे. देशातील वारसास्थळांबाबतचा हा आदर आहे. अयोध्या, काशी विश्वनाथ धाम, माँ विंध्यवासिनी धाम, प्रयागराजला भेट द्या. राज्यात अनेक नवीन गोष्टी घडत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. 

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार राम कथा संग्रहालय आणि आर्ट गॅलरी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. यासाठी लखनऊ येथे सामंजस्य करार करण्यात येणार आहे. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश