शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Uttar Pradesh Election 2022: अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार, कोण आहे राजा भैय्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:10 IST

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्व पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. अशावेळी प्रचाराच्या रणांगणात दबंग नेत्यांची कमी नाही. जे त्यांच्या प्रतिमेमुळे निवडणुकीत प्रभाव पाडतात. त्यात एक नाव म्हणजे माजी कॅबिनेट मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत बाजी मारली.

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदय प्रताप सिंह आणि आईचं नाव मंजुल राजे होतं. त्यांची आईही राज घराण्यातून आहे. राज भैय्याला तूफान सिंह नावानंही ओळखलं जातं. त्यांना घोडेस्वारीचा नाद आहे. एकदा घोड्यावरुन पडलेल्या त्यांना मोठी दुखापत झाली होती. त्याशिवाय बुलेट आणि जिप्सी चालवण्यासह हेलिकॉप्टरनं प्रवास करणं हा त्यांचा छंद आहे. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत राजा भैय्या यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते सातत्याने आमदार आहेत.

एकेकाळी मुलायम सिंह यादव यांनी रघुराज प्रताप सिंह यांच्यावर दंगलीत सहभागी असल्याचा आरोप केला होता. राजा भैय्या त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांना खूप घाबरतात. लहानपणी त्यांनी वडिलांच्या नजरेला नजर मिळवली नाही. राजा भैय्याकडे जवळपास २०० कोटींहून अधिक संपत्ती आहे. एकदा यूपीत विधानसभा निवडणुकीत राजा भैय्याविरोधात प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह स्वत: पोहचले होते. मात्र तरीही याठिकाणी भाजपाचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतर राजा भैय्या यांना गुंडा म्हणून संबोधणारे कल्याण सिंह यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात राजा भैय्याचा समावेश केला. राजा भैय्या यांनीही प्रामाणिकपणे काम केले. जेव्हा बसपा सुप्रीमो मायावती यांनी तत्कालीन भाजपा सरकारचं समर्थन मागे घेतले तेव्हा राजा भैय्याने सरकार वाचवण्यासाठी कल्याण सिंह यांची खूप मदत केली. मात्र त्यानंतर बसपा सरकार आलं आणि राजा भैय्या यांच्यावर पोटा कायद्यातंर्गत कारवाई केली. त्यांना जेलमध्ये पाठवलं. २००३ मध्ये मायावती सरकारने भदरी येथील राजा भैय्या यांच्या वडिलांच्या महालावर छापेमारी केली.

२०१२ मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार बनलं. राजा भैय्या यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. परंतु त्यावेळी प्रतापगडच्या कुंडा येथे हायप्रोफाईल मर्डर झाला. ज्यात डिप्टी एसपी जिया उल हक यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात राजा भैय्या यांचे नाव आले. ज्यामुळे अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली. त्यानंतर राजा भैय्याला क्लीनचीट मिळाली. तेव्हा ८ महिन्यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात राजा भैय्याचा समावेश झाला. राजा भैय्या यांच्यावर अनेक खूनाचे आरोप आहेत.

यंदाच्या निवडणुकीत राजा भैय्या यांनी स्वत:चा पक्ष बनवला आहे. ज्याचं नाव जनसत्ता दल लोकतांत्रिक असं ठेवलंय. त्यांच्या नव्या पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगाने करवत दिली आहे. आता या निवडणुकीत राजा भैय्याचा पक्ष काय कमाल दाखवतो ते पाहणं गरजेचे आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा